शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:18 IST

कणकवली : नोटाबंदी म्हणजे चलनशुद्धी असून हा मूळचा गांधी विचार आहे. महात्मा गांधीजींचे सहकारी विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चिंतनातून चलनशुद्धी हा विचार पुढे आला.

कणकवली : नोटाबंदी म्हणजे चलनशुद्धी असून हा मूळचा गांधी विचार आहे. महात्मा गांधीजींचे सहकारी विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चिंतनातून चलनशुद्धी हा विचार पुढे आला. 1956 रोजी अप्पासाहेब पटवर्धनांनी हा विचार मांडला. मात्र, काँग्रेसला आता गांधी विचारांचा विसर पडला आहे. त्यांनी गेली 60 वर्षे बेनामी संपत्ती निर्माण केली असून, आता त्याला सुरुंग लागला असल्याने काँग्रेसने आक्रोश आंदोलन सुरू केले आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.येथील भाजप संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, शिशिर परूळेकर , बबलू सावंत उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार म्हणाले, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करून कठोर पावले उचलली. त्यामुळे यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी आम्ही काळा पैसा विरोधी दिन साजरा केला.कासार्डे येथे कणकवली विधानसभा मतदारसंघाचा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी 350 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अतुल काळसेकर, संदेश पारकर, राजन तेली तसेच अन्य प्रमुख पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. नोटाबंदीच्या नावाने गळा काढणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी अप्पासाहेब पटवर्धनांचे चरित्र वाचावे. त्यामुळे त्यांना नोटाबंदी हा गांधी विचार होता हे समजेल. आतापर्यंत काळ्या पैशाची दिवाळी करणाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली आहे. मात्र, या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारत आर्थिक महासत्ता बनेल. यापुढे आता बेनामी संपत्ती बाहेर काढण्याची लढाई आम्ही सुरू करणार आहोत.गांधी विचार काँग्रेसला पेलवत नसल्याने नरेंद्र मोदी यांनी त्याची आठवण त्यांना करून दिली. नोटाबंदीमुळे सामान्य करदाता खूश आहे. जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाकडे कराच्या माध्यमातून पैसा उपलब्ध होईल. हा निर्णय धारिष्ठ्याचा होता. तसेच आव्हानात्मक होता. सामान्य कुवतीचा तसेच दुर्बळ मनाचा पंतप्रधान हा निर्णय घेऊ शकत नव्हता. तो निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हा निर्णय अजूनही हजम होत नाही.कणकवली तालुक्यातील गोपुरी येथे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा हा विचार देशभर पोहोचला याबाबत आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे 13 नोव्हेंबर रोजी अप्पासाहेबांचे आत्मचरित्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आम्ही भेट देणार आहोत, असेही जठार यावेळी म्हणाले. 11 नोव्हेंबर रोजी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा भाजपाचा मेळावा घेण्यात येणार आहे. तर त्यानंतर 50 जिल्हा परिषद गट व जिल्ह्यातील 8 शहरे असे 58 मेळावे होतील. आजच्या कासार्डे येथील मेळाव्यात बूथ प्रमुख अॅपचे उदघाट्न करण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रत्येक गावात जाऊन एक बूथ प्रमुख व 25 सदस्य अशा 26 जणांची यादी या अॅपवर लोड करणार असल्याचे प्रमोद जठार यानी सांगितले.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपा