शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आचारसंहितेबाबत 1950 क्रमांकावर तक्रार करा, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:54 IST

आचारसंहितेबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असेल तर 1950 या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी येथील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभागृहातील शासकीय अधिकाऱ्यांची बैठकसजगतेने, समन्वयाने सर्वांनी निवडणूक कामकाज करावे  : सुनिल चव्हाण

सिंधुदुर्गनगरी : निवडणूकी संदभार्तील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजगतेने व समन्वयाने कामकाज पार पाडावे, आचारसंहितेबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असेल तर 1950 या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी येथील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या बैठकीत केले.बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल आॅफिसर आदी अधिकारी उपस्थित होते.लोकशाहीच्या जागरात महत्वपूर्ण भूमिका व जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळत आहे या दृष्टीकोनातून निवडणूकीच्या कामाकाजाकडे पहावे असे सूचित करुन  चव्हाण म्हणाले की, या बैठकीत विविध कमिट्यांची व विविध कार्यालयीन अधिकारी वगार्ची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, निवडणूक संदर्भात कायदे, आदर्श आचार संहितेबाबत घ्यावयाची खबरदारी, सभा, मिरवणूक, लाऊड स्पीकर आदी परवानग्या देण्याची पद्धती आदी बाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली जाईल. याचा अभ्यास करावा व समन्वयाने सर्व कामकाज पार पाडावे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पी.पी.टी च्या माध्यमातून आदर्श आचार संहिता, विविध पथकांची कार्यप्रणाली, निवडणूक विषयक कायदे व भंगाबाबतच्या शिक्षा या बाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांचे सण, धार्मिक सण साजरे करताना आदर्श आचार संहिता पालनाबाबत कटाक्षाने लक्ष घालावे. पण जे आचार संहितेत नाही त्याचा बाऊ करुन नागरिकांना नाहक त्रास देणे टाळावे.

सेक्टर आॅफिसरनी केवळ मतदान केंद्रापुरते लक्ष न देता त्याच्या परिसराचा सुद्धा सखोल अभ्यास करावा अशा सूचना या बैठकीत केल्या. शेवटी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग