शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी समिती  - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 22:12 IST

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे ...

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.मंत्री दीपक केसरकर हे रविवारी शासकीय बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, तहसीलदार सतीश कदम, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सांगली येथील घटनेनंतर शासन पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. त्यासाठी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील पंधरा दिवसात कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याबाबत आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर उचित असा निर्णय घेईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. तसेच अहमदनगर घटनेबाबतही एखाद्या शेतकºयावर गोळीबार करणे चुकीचे आहे. पण अशी आंदोलने होत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी बैठक घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. गोळीबारापर्यंत विषय येऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.आंबोली येथील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची दखल घेत आम्ही आंबोलीत आणखी एक तपासणी नाका लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हा नाका लावण्यात आला आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र एवढ्यावरच शासन थांबणार नाही, तर माथेरान तसेच अन्य पर्यटन स्थळांवर ज्या प्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत, तसे पोलीस ठाणे आंबोलीत निर्माण करण्यात येणार आहे. हे पोलीस ठाणे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना आंबोलीत रूजविण्यात येईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊ, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर येथील महिला पोलिस अधिकारी गेले दीड वर्ष बेपत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे रितसर तक्रार आली तर त्यावर अधिक भाष्य करेन, असे सांगत याची मी स्वत: माहितीही घेईन आणि यात काय करता येईल हे तपासून बघितले जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार