शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी समिती  - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 22:12 IST

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे ...

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.मंत्री दीपक केसरकर हे रविवारी शासकीय बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, तहसीलदार सतीश कदम, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सांगली येथील घटनेनंतर शासन पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. त्यासाठी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील पंधरा दिवसात कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याबाबत आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर उचित असा निर्णय घेईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. तसेच अहमदनगर घटनेबाबतही एखाद्या शेतकºयावर गोळीबार करणे चुकीचे आहे. पण अशी आंदोलने होत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी बैठक घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. गोळीबारापर्यंत विषय येऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.आंबोली येथील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची दखल घेत आम्ही आंबोलीत आणखी एक तपासणी नाका लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हा नाका लावण्यात आला आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र एवढ्यावरच शासन थांबणार नाही, तर माथेरान तसेच अन्य पर्यटन स्थळांवर ज्या प्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत, तसे पोलीस ठाणे आंबोलीत निर्माण करण्यात येणार आहे. हे पोलीस ठाणे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना आंबोलीत रूजविण्यात येईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊ, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर येथील महिला पोलिस अधिकारी गेले दीड वर्ष बेपत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे रितसर तक्रार आली तर त्यावर अधिक भाष्य करेन, असे सांगत याची मी स्वत: माहितीही घेईन आणि यात काय करता येईल हे तपासून बघितले जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार