शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सिंधुदुर्गमधील विकृती नष्ट करण्यासाठी एकत्र या!, विनायक राऊत यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Updated: June 22, 2023 15:36 IST

श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंतांचा व संस्कृतीचे संवर्धन करणारा आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू अशा विचारवंतांना सिंधुदुर्गवासीयांनी खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यात राजकीय दहशतवाद व दादागिरी ही विकृती फोफावत चालली आहे. या विकृतीने विचारी व परोपकारी श्रीधर नाईक यांचा बळी घेतला. त्यामुळे ही विकृती नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्गवायांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे आदरांजली कार्यक्रम, रक्तदान शिबीर , बचतगटांच्या महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नाईक कुटुंबीय व श्रीधर प्रेमींनी केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी  आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,नीलम सावंत-पालव, मुरलीधर नाईक, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा श्रीधर नाईक यांचे सुपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले,  श्रीधर नाईक यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे सूपुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक, पुतणे आमदार वैभव नाईक समर्थपणे पुढे नेत आहेत. नाईक कुटुंबीय सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहेत. सुशांत नाईक हे युवासेनेचे काम करीत असून त्यांना चांगले राजकीय भवितव्य निश्चितच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार वैभव नाईक यांनी श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे नेत राहिलो, त्यामुळे मी आमदार होऊ शकलो असे मत व्यक्त केले.पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत नाही याची खंतसिंधुदुर्गात फोफावलेल्या अपप्रवृतीविरोधात श्रीधर नाईक यांनी संघर्ष केला. कार्यकर्ता पक्षासाठी जीवाचे रान करून पक्षवाढीसाठी कार्य करतो. मात्र, त्याच्या पाठिशी खंबीरपणे  पक्ष उभा राहत नाही, अशी खंत व्यक्त करतानाच श्रीधर नाईक यांच्याबाबतीत हेच घडले. जिल्ह्यात सध्या आसूरी शक्ती वाढत असून या शक्तीचा बीमोड करण्यासाठी श्रीधर नाईक प्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन सुधीर सावंत यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत