शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:15 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा मिळणारे उत्पन्न मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी

निकेत पावसकरतळेरे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेजवली गावात स्थानेश्वर देव व निनादेवी मंदिराची ५ एकर जागा आहे. या जागेवर मधलीवाडी, भटवाडी, वरचीवाडी या वाडीतील प्रत्येक गावातील एक-दोन माणसे एकत्रित येऊन उन्हाळी व पावसाळी शेती करतात. दरवर्षी पावसाळी शेती करायला १५ ते २० जोते असतात. यावर्षी १५ जोते होती. तर काम करायला लहानांपासून वृद्धापर्यंत सुमारे ४५ माणसे होती.मशागतीपासून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गावात शेतीच्या कामाला सुरुवात याच जागेवर मशागत करून केली जाते. मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो. यावर्षी १५ किलो बियाणे पेरले असून शेती करायला ३ दिवस लागले.

ही जमीन पाणथळ असल्याने तिथे उशिरा शेती केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून निनादेवी मंदिरात नियमित दर मंगळवारी महाप्रसाद असतो. त्यासाठीही या शेतीतून मिळणारे उत्पन्न वापरले जाते. ही सामूहिक शेती केव्हापासून सुरू आहे हे कोणालाही माहीत नाही.उत्सवात लागणारा तांदुळ याच शेतीतून पिकतोया मंदिरात वार्षिक सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगा, नवरात्र, देवदिवाळी, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी आणि कार्तिकी एकादशी असे विविध सण साजरे केले जातात. याशिवाय निनादेवीचा २६ एप्रिलला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी महाप्रसादासाठी लागणारे तांदुळ या शेतीतील उत्पन्नामधून घेतले जातात. उर्वरित तांदुळ ज्यांची शेती नाही अशांना विक्री केली जाते. याच जमिनीवर कुळीथ, मूग आणि मटकीची शेती केली जाते. यावर्षी पेरलेल्या १५ किलो बियाण्यांपासून सुमारे ४0 मण भात मिळेल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग