शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:15 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा मिळणारे उत्पन्न मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी

निकेत पावसकरतळेरे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेजवली गावात स्थानेश्वर देव व निनादेवी मंदिराची ५ एकर जागा आहे. या जागेवर मधलीवाडी, भटवाडी, वरचीवाडी या वाडीतील प्रत्येक गावातील एक-दोन माणसे एकत्रित येऊन उन्हाळी व पावसाळी शेती करतात. दरवर्षी पावसाळी शेती करायला १५ ते २० जोते असतात. यावर्षी १५ जोते होती. तर काम करायला लहानांपासून वृद्धापर्यंत सुमारे ४५ माणसे होती.मशागतीपासून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गावात शेतीच्या कामाला सुरुवात याच जागेवर मशागत करून केली जाते. मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो. यावर्षी १५ किलो बियाणे पेरले असून शेती करायला ३ दिवस लागले.

ही जमीन पाणथळ असल्याने तिथे उशिरा शेती केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून निनादेवी मंदिरात नियमित दर मंगळवारी महाप्रसाद असतो. त्यासाठीही या शेतीतून मिळणारे उत्पन्न वापरले जाते. ही सामूहिक शेती केव्हापासून सुरू आहे हे कोणालाही माहीत नाही.उत्सवात लागणारा तांदुळ याच शेतीतून पिकतोया मंदिरात वार्षिक सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगा, नवरात्र, देवदिवाळी, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी आणि कार्तिकी एकादशी असे विविध सण साजरे केले जातात. याशिवाय निनादेवीचा २६ एप्रिलला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी महाप्रसादासाठी लागणारे तांदुळ या शेतीतील उत्पन्नामधून घेतले जातात. उर्वरित तांदुळ ज्यांची शेती नाही अशांना विक्री केली जाते. याच जमिनीवर कुळीथ, मूग आणि मटकीची शेती केली जाते. यावर्षी पेरलेल्या १५ किलो बियाण्यांपासून सुमारे ४0 मण भात मिळेल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग