शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:15 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशेजवलीत ५ एकर जागेत सामूहिक शेती, पिढ्यान्पिढ्यांची परंपरा मिळणारे उत्पन्न मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी

निकेत पावसकरतळेरे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शेजवली (जि. रत्नागिरी) गावात एक आगळीवेगळी परंपरा पहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्रित येऊन सुमारे ५ एकर जागेत उन्हाळी व पावसाळी शेती करतात. यातून मिळणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, अशी माहिती रवी पवार यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, शेजवली गावात स्थानेश्वर देव व निनादेवी मंदिराची ५ एकर जागा आहे. या जागेवर मधलीवाडी, भटवाडी, वरचीवाडी या वाडीतील प्रत्येक गावातील एक-दोन माणसे एकत्रित येऊन उन्हाळी व पावसाळी शेती करतात. दरवर्षी पावसाळी शेती करायला १५ ते २० जोते असतात. यावर्षी १५ जोते होती. तर काम करायला लहानांपासून वृद्धापर्यंत सुमारे ४५ माणसे होती.मशागतीपासून शेतीच्या कामाला सुरुवात होते. गावात शेतीच्या कामाला सुरुवात याच जागेवर मशागत करून केली जाते. मशागतीपासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळेपर्यंत सामूहिक सहभाग दिसून येतो. यावर्षी १५ किलो बियाणे पेरले असून शेती करायला ३ दिवस लागले.

ही जमीन पाणथळ असल्याने तिथे उशिरा शेती केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून निनादेवी मंदिरात नियमित दर मंगळवारी महाप्रसाद असतो. त्यासाठीही या शेतीतून मिळणारे उत्पन्न वापरले जाते. ही सामूहिक शेती केव्हापासून सुरू आहे हे कोणालाही माहीत नाही.उत्सवात लागणारा तांदुळ याच शेतीतून पिकतोया मंदिरात वार्षिक सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगा, नवरात्र, देवदिवाळी, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी आणि कार्तिकी एकादशी असे विविध सण साजरे केले जातात. याशिवाय निनादेवीचा २६ एप्रिलला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावेळी महाप्रसादासाठी लागणारे तांदुळ या शेतीतील उत्पन्नामधून घेतले जातात. उर्वरित तांदुळ ज्यांची शेती नाही अशांना विक्री केली जाते. याच जमिनीवर कुळीथ, मूग आणि मटकीची शेती केली जाते. यावर्षी पेरलेल्या १५ किलो बियाण्यांपासून सुमारे ४0 मण भात मिळेल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग