शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
2
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
3
Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
4
'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत
5
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
6
नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 'या' मराठी नावाची चर्चा
7
Reasi Terror Attack : दहशतवाद्यांची आता खैर नाही, रियासी हल्ल्याचा तपास NIA टीम करणार! 
8
Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...
9
"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
10
छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा
11
Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न
12
मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!
13
"बुमराह, आता फक्त POK राहिलाय...", IND vs PAK सामन्यानंतर हृषिकेश जोशी यांची मजेशीर पोस्ट
14
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
15
एक वृत्त आणि Suzlon Energy चा शेअर जोरदार आपटला, पाहा काय आहे कारण? 
16
खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!
17
"आता ३० मिनिटांनी भेटू.."; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली...
18
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
19
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
20
निवडणूक निकाल : Share Marketच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केली 'ही' मोठी मागणी

अगोदर भाजपमधील भ्रष्टाचार साफ करा?

By admin | Published: January 06, 2017 11:00 PM

नारायण राणे : नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे धरणे

सिंधुदुर्गनगरी : काळा पैसा व भ्रष्टाचार संपविण्यासाठी नोटाबंदी आवश्यक म्हणणाऱ्या सरकारने अगोदर भाजपमधील भ्रष्टाचार साफ करावा, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून, सर्वच ठिकाणी मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेवर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पक्ष आदेशाची वाट न पाहता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करा, अशा सूचना राणे यांनी कार्यकर्त्यांना देत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.नोटाबंदीमुळे देशात वाढत जाणारी महागाई आणि जिल्ह्याचा ठप्प झालेला विकास याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, संदेश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, दीपलक्ष्मी पडते, डॉ. जयेंद्र परुळेकर, अस्मिता बांदेकर, मेघा गांगण यांच्यासह जिल्हा तालुका काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे निवेदन सादर केले व जिल्हा काँग्रेसच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन शासनस्तरावर पाठविले जाईल, असे स्पष्ट केले. धरणे आंदोलनाचा समारोप दुपारी ३.३० वाजता झाला. (प्रतिनिधी)उपासमर म्हणजे क्रांती म्हणायची का?नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात ८६ टक्के म्हणजेच १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे चलन एकाचवेळी रद्द झाले. ४५ कोटी जनतेला याचा फटका बसला. महागाईने उचांक काढला. उपासमार म्हणजेच क्रांती म्हणायची का? देशातील ४८ टक्के लोकांना बँकेची ओळखच नाही. अशा परिस्थितीत डिजिटल इंडियाची देण्यात आलेली हाक हास्यास्पद असल्याच्या भाषेत केंद्र सरकारची खिल्ली नारायण राणे यांनी उडविली.अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरा नोटाबंदीच्या विरोधात छेडलेले आजचे आंदोलन हे एका दिवसापुरते मर्यादित ठेवायचे नाही. ज्या-ज्या ठिकाणी अन्यायकारक परिस्थिती दिसेल तेथे तेथे स्वतंत्रपणे पक्ष आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उतरून आंदोलने छेडावीत, असे आवाहनही आमदार नारायण राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले. लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने सरकार किंवा पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस कदापि गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास पालकमंत्री दीपक केसरकर असमर्थ ठरत असल्याचे सांगून त्यांचा जिल्ह्याच्या विकासाबाबतचा अभ्यास कमी असल्याचा आरोप केला.तिरंगी भजनबारीने आंदोलनात रंगशुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नोटाबंदी विरोधात भजनाने आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे तासभर तिरंगी भजनीबारीने धरणे आंदोलनात रंग भरला. भजनीबुवा संतोष कानडे, प्रकाश पारकर व गुंडू सावंत यांनी ‘पैसा ठरवला खोटा, काम मिळेना बंद करून नोटा’ असा सवाल भजनी ठेका गाण्यावर करीत आंदोलनकर्त्यांना खिळवून ठेवले.