शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आपल्या नावावर एकतरी आमदार निवडून आणा

By admin | Updated: October 25, 2015 23:33 IST

नीलेश राणे : मंडणगड नगरपंचायत प्रचारसभेत रामदास कदमांना आव्हान

मंडणगड : स्वत:ला कोकणचे नेते म्हणून संबोधणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांनी हिंमत असल्यास आपल्या नावाने एखादा तरी आमदार निवडून आणावा, नंतरच आक्रमकतेच्या पोकळ गमजा माराव्यात, अशा शब्दांत काँग्रसचे युवा नेते नीलेश राणे यांनी रामदास कदमांवर टीका केली.मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेसाठी राणे मंडणगड येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ज्यांची राणेंशी नजर मिळवण्याची ताकद नाही, ते आमच्याशी काय लढणार? याउलट राणेंनी मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवून दाखवली आहे. रामदास कदम यांची तोतरी आक्रमकता पोकळ असून, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही, असे राणे म्हणाले.कोकणातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. राज्यात सत्तेसाठी भाजपची भांडी घासण्याचे काम शिवसेना करीत आहे. हिंमत असेल तर वेगळी चूल मांडत सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान त्यांनी दिले. पंचवीस वर्षे लोकांकडून पान व तंबाखू खाऊन लोकांनाच चुना लावला. सडलेल्या दातांप्रमाणे जनतेला सडलेले रस्ते आंदणात दिल्यानेच जनतेने शेवटी त्यांच्या कंबरेत लाथ घातली आहे, असे राणे म्हणाले.आमदार संजय कदम यांनी निवडणुकांनिमित्त शहरात यशस्वी केलेल्या महाआघाआडीच्या प्रयोगांचे विशेष कौतुक करताना आमदारांनी केलेला प्रयोग कोकणासह राज्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते माजी आमदार भाई जगताप, आमदार संजय कदम, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय भोसले, राष्ट्रवादी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, काँग्रसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, रिपाइं तालुका कार्याध्यक्ष सुभाष तांबे, सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, चिपळूण उपनराध्यक्ष लियाकत शहा, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष सावंत, रमेश दळवी, संतोष मांढरे, गणेश रुखे, समद मांडलेकर, संदेश चिले, कादीर बुरोंडकर, राजा लेंढे, विनीत रेगे, अशोक कोकाटे व रघुनाथ देवरुखकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाळासाहेब आमचे दैवतच : राणेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब आजही आमचे दैवत आहेत. मात्र, उद्घव ठाकरेंनी पैशांसाठी आमदार व खासदारकीची तिकिटे विकली आता खांदे पाडून शिवसेनेची ताकद संपवून टाकली. शिवाजी महाराज व भगव्याच्या नावावर भावनिक भाषणे करुन जनतेची माथी भडकवण्याचा शिवसेनेचा धंदा जुना असल्याचे ते म्हणाले.