शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कौल मिळताच चिंदर गाव पुन्हा भरला; तीन दिवस लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:36 AM

आचरा : परंपरा जपणाऱ्या चिंदर गावची गावपळण पूर्ण झाल्याचा कौल ग्रामदैवत रवळनाथाने दिल्याने तीन दिवसांनी गावकरी गावात परतले. ग्रामस्थांनी ...

आचरा : परंपरा जपणाऱ्या चिंदर गावची गावपळण पूर्ण झाल्याचा कौल ग्रामदैवत रवळनाथाने दिल्याने तीन दिवसांनी गावकरी गावात परतले. ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून पुन्हा गाव गाठला आहे.दर तीन वर्षांनी होणाºया गावपळणीकरिता यावर्षी तब्बल १० वर्षांनी कौल दिल्याने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत ही गावपळण झाली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ या गावपळणीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिंबक येथे चिंदरवासीय झोपड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकºयांनी घेतला.तीन रात्रींच्या मुक्कामानंतर देव रवळनाथाचा कौल झाल्याने चिंदरवासीय मंगळवारी मिळेल त्या वाहनाने घराकडे धाव घेताना दिसत होते. ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार झटक्यात आवरताना दिसत होते. देवाच्या श्रद्धेपोटी ग्रामस्थ गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात निवांतपणे राहत होते. देवावरील श्रद्धेमुुळेच कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही, असे ग्रामस्थ अभिमानाने सांगत होते. सोशय मीडियावर गाव भरण्याचा कौल काही क्षणातच चिंदरवासीयांपर्यंत पोहोचल्याने तत्काळ ग्रामस्थ गावी येण्यास सुरुवात होऊन गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.