शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

वर्षात दोनवेळा चिक्की वाटप

By admin | Updated: July 2, 2015 23:25 IST

विविध प्रश्नांवर चर्चा : वेंगुर्ले पंचायत समिती सभेत उमटले पडसाद

सावंतवाडी : स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी महाराष्ट्रात लावलेल्या ‘लोकमत’ च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सामाजिक, शैक्षणिक, शेती विषयक सर्व प्रश्नांना न्याय देऊन ‘लोकमत’ घराघरात पोहोचला आहे. राज्यात सर्वत्र सध्या अपुरा रक्तपुरवठा आहे. रक्ताची गरज ओळखून जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज सावंतवाडीत घेतलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना केले.दरम्यान, ‘लोकमत’ने राज्यभर व गोवा राज्यात गुरुवारी घेतलेल्या शिबिरात एकूण १२५४ जणांनी रक्तदान केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येथील बॅ. नाथ पै सभागृहात भव्य रक्तदान शिबिर गुरूवारी पार पडले. या शिबिराचे उद्घाटन बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना साळगावकर बोलत होते.यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, उपनिरीक्षक कळेकर, वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, मंगेश तळवणेकर, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक, नगरसेवक देवेंद्र टेमकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, साक्षी कुडतरकर, शुभांगी सुकी, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू, कोकण मराठी साहित्य परिषदेचे भरत गावडे आणि ‘लोकमत’ परिवारातील सदस्य उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)राजकारण्यांना दिशा देण्याचे काम : साळगावकर‘लोकमत’ या दैनिकाने कोकणात स्थापनेनंतर गेल्या आठ वर्षात अनेक प्रश्नांना वाचा फोडली. कोकणच्या विकासप्रक्रियेत या दैनिकाचा मोठा वाटा आहे. तळागाळातील समस्या जाणून घेऊन त्यांना व्यासपीठ देण्याचा कायमच ‘लोकमत’ने प्रयत्न केला आहे. तसेच राज्यात अनेक प्रश्न सोडवून राजकारण्यांना दिशा देण्याचे काम ‘लोकमत’ करीत आहे. तसेच सामाजिक सलोख्याच्या भावनेतून ‘लोकमत’ कायमच उपक्रम राबवित आहे. त्यामुळेच ते लोकप्रिय दैनिक बनले आहे, असे गौरवोद्गारही बबन साळगावकर यांनी यावेळी काढले.रक्तसाठा करणे गरजेचे : रणजीत देसाईदररोज रूग्णांना रक्ताची उणिव भासत असते. मात्र, रक्ताचा साठाच उपलब्ध नसतो. याची दखल घेत ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराचा घेतलेला उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. सध्या निगेटिव्ह रक्ताचा साठा अत्यंत अल्प प्रमाणात आढळून येतो. या निगेटिव्ह रक्ताची गरज रूग्णांना जास्त प्रमाणात भासते. यामुळे निगेटिव्ह रक्ताकडे लक्ष ठेवत जास्तीत जास्त रक्तसाठा करणे गरजेचे आहे, असे मत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी बोलताना व्यक्त केले.१६ जणांनी केले रक्तदानसावंतवाडी येथे ‘लोकमत’ ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक मिळून १६ जणांनी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे सहकार्य लाभले.