शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: June 10, 2023 18:09 IST

सावंतवाडी : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा किंवा कोणाला वगळावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत मी ...

सावंतवाडी : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा किंवा कोणाला वगळावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असे मत शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी माडले. राज्यमंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा आहे. यावर शनिवारी सावंतवाडीत आलेल्या मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे अमित कामत शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आबा केसरकर, महादेव राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, मंत्रिमंडळात फेरफार करणे किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देणे बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. तो विषय माझा नाही त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा राज्यातील दंगल शासन पुरस्कृत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत राजकीय आरोप करत आहेत. त्यांची टीका निरर्थक आहे. त्यांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले.दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मोती तलावातील कामाचा आढावा घेतला. तलावातील गाळ काढला जात असून याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदे