शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

महिला शिक्षकांसमोर आव्हाने

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

परिस्थिती बिकट : भौगोलिक परिस्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शृंगारतळी : रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जंगले तुडवत गेल्याशिवाय शाळांपर्यंत पोहोचता येणे अशक्य बनले असून, काही ठिकाणी महिला शिक्षकांना तेथे पोहोचणेही जिकीरीचे बनले आहे. अशा परिस्थितीतही तेथे अध्यापनाचे काम सुरू आहे. मात्र, हे करताना सुरक्षेचे प्रबंध करावेत, अशी मागणी काही ठिकाणाहून केली जात आहे. अनेक ठिकाणी अशा शाळांवर जाणाऱ्या महिला शिक्षिकांची हेळसांड होत असल्याने अशा शिक्षकांच्या सुविधांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अशा शाळांचा अहवाल तयार करून तेथे कार्यरत असणाऱ्या शिक्षक अथवा महिला शिक्षकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातून होत आहे. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही नाईलाजाने काम करावे लागत असून, किनाऱ्यालगतच्या गावातून असलेल्या शाळांमध्येही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. जिल्हयाच्या समुद्राच्या खाडी किनारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करणाऱ्या महिला शिक्षकांची या परिस्थितीमुळे हेळसांड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या महिला शिक्षकांनी पंचायत समितीकडे दाद मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.या संर्दभात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे़ मात्र, रत्नागिरी जिल्हयातील समुद्राच्या खाडीलगत असणाऱ्या प्राथमिक शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी व राजापूर येथील परिस्थिती संवेदनशील बनत असून, अशा महिला शिक्षकांवर भौगोलिक सुविधा नसतानाही काम करण्याची यानिमित्ताने वेळ येत आहे. नाईलाजास्तव ठिकाणी अध्यापनाचे काम करावे लागत असल्याने महिलांचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ त्यामुळे आपोआपच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे़ बहुतेक ठिकाणी चढउतार व जंगलाची वाट तुडवत शाळेत जावे लागत आहे़ काही ठिकाणी बोटीने प्रवास करून खाडी पार करावी लागत असल्याचेही चित्र आहे. जिल्ह्यातील अशा विविध गावात कसल्याच सुखसोयी व राहण्याची व्यवस्था नसल्याने दूर अंतरावरून ये-जा करण्याची वेळ महिला शिक्षकावर आली आहे. अशीच एक, अडगळीच्या ठिकाणी गुहागर तालुक्यातील काताळे नवानगर उर्दू शाळा आहे़ ही परिस्थिती पाहता महिला शिक्षकांना याठिकाणी अध्यापनाचे काम करणे जिकीरीचे आहे़ त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने यांसारख्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)दुर्गम भागात शिक्षकांसमोर अडचणी कोकणातील डोंगरी भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या शिक्षिकांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिक्षिका त्रस्त आहेत. जिल्हा परिषदेने अशा शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. महिला सुरक्षा शिफारसींची अंमलबजावणी हवी, अशी मागणी होत आहे.