शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिला शिक्षकांसमोर आव्हाने

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

परिस्थिती बिकट : भौगोलिक परिस्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शृंगारतळी : रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जंगले तुडवत गेल्याशिवाय शाळांपर्यंत पोहोचता येणे अशक्य बनले असून, काही ठिकाणी महिला शिक्षकांना तेथे पोहोचणेही जिकीरीचे बनले आहे. अशा परिस्थितीतही तेथे अध्यापनाचे काम सुरू आहे. मात्र, हे करताना सुरक्षेचे प्रबंध करावेत, अशी मागणी काही ठिकाणाहून केली जात आहे. अनेक ठिकाणी अशा शाळांवर जाणाऱ्या महिला शिक्षिकांची हेळसांड होत असल्याने अशा शिक्षकांच्या सुविधांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अशा शाळांचा अहवाल तयार करून तेथे कार्यरत असणाऱ्या शिक्षक अथवा महिला शिक्षकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातून होत आहे. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही नाईलाजाने काम करावे लागत असून, किनाऱ्यालगतच्या गावातून असलेल्या शाळांमध्येही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. जिल्हयाच्या समुद्राच्या खाडी किनारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करणाऱ्या महिला शिक्षकांची या परिस्थितीमुळे हेळसांड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या महिला शिक्षकांनी पंचायत समितीकडे दाद मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.या संर्दभात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे़ मात्र, रत्नागिरी जिल्हयातील समुद्राच्या खाडीलगत असणाऱ्या प्राथमिक शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी व राजापूर येथील परिस्थिती संवेदनशील बनत असून, अशा महिला शिक्षकांवर भौगोलिक सुविधा नसतानाही काम करण्याची यानिमित्ताने वेळ येत आहे. नाईलाजास्तव ठिकाणी अध्यापनाचे काम करावे लागत असल्याने महिलांचे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ त्यामुळे आपोआपच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे़ बहुतेक ठिकाणी चढउतार व जंगलाची वाट तुडवत शाळेत जावे लागत आहे़ काही ठिकाणी बोटीने प्रवास करून खाडी पार करावी लागत असल्याचेही चित्र आहे. जिल्ह्यातील अशा विविध गावात कसल्याच सुखसोयी व राहण्याची व्यवस्था नसल्याने दूर अंतरावरून ये-जा करण्याची वेळ महिला शिक्षकावर आली आहे. अशीच एक, अडगळीच्या ठिकाणी गुहागर तालुक्यातील काताळे नवानगर उर्दू शाळा आहे़ ही परिस्थिती पाहता महिला शिक्षकांना याठिकाणी अध्यापनाचे काम करणे जिकीरीचे आहे़ त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने यांसारख्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)दुर्गम भागात शिक्षकांसमोर अडचणी कोकणातील डोंगरी भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या शिक्षिकांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने शिक्षिका त्रस्त आहेत. जिल्हा परिषदेने अशा शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. महिला सुरक्षा शिफारसींची अंमलबजावणी हवी, अशी मागणी होत आहे.