शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेपुढे गड राखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 22:15 IST

शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.

शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सत्तास्थानी असलेली शिवसेना आपला गड कायम राखणार की सत्तांतर होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीत तीन प्रभागांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सात जागा आहेत. सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदाच्या सात जागांपैकी प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर आर. पी. आय. च्या वैशाली वळंजू या बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे, यासाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग एक मध्ये पोखरबांव या भागाचा समावेश असून प्रभागातील दोन जागांपैकी एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित आहे. या जागेवर शिवसेनेचे मिलिंद मोंडकर, समर्थ विकास पॅनेलचे महिंद्र तेली तर भाजपाचे सुहास मिठबांवकर रिंगणात आहेत. तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. या जागेवर भाजपाच्या संचिता सावंत, समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई तर शिवसेनेच्या तेजस्विनी सावंत यांनी उमेदवारी दाखल केली आहे.प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर आरपीआयच्या वैशाली वळंजू यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने व तो वैध ठरल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याच प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या समिता तेली व भाजपच्या सविता तेली यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या प्रभागात बौद्धवाडी, कदमवाडी, मुस्लिमवाडी, तेलीवाडी आणि देसाईवाडी या भागांचा समावेश आहे.प्रभाग तीनमध्ये सदस्यांच्या तीन जागा असून, या प्रभागात सावंतवाडी, घाडीवाडी, सुतारवाडी, डोबवाडी, टेमवाडी, इळकारवाडी या भागांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी असलेल्या दोन जागांसाठी शिवसेनेने गजेंद्र सावंत, राजेश घाडी, समर्थ विकास पॅनेलचे प्रवीण सावंत, जितेंद्र सावंत तर भाजपाने माजी सरपंच प्रकाश सावंत व सुरेश मिठबावकर यांना उमेदवारी दिली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई, भाजपाच्या समिक्षा घाडी व शिवसेनेच्या कल्पना सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर अशी लढत होत असे. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शिवसेना व काँग्रेसमधील ८४ कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच उमेदवार रिंगणात उभे केल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.विजयाकडे सर्वांचेच लक्षराज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे वळीवंडे हे होम पिच आहे. शिवसेना सोडून भाजपामध्ये गेलेले कार्यकर्ते, भाजपाने निवडणुकीत पहिल्यांदाच उभे केलेले उमेदवार, कोणत्याही पक्षांची एकमेकांशी नसलेली युती किंवा आघाडी यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची केलेली आहे. निवडणूक असून सध्या सत्ताधारी असलेली शिवसेना विजयाची घोडदौड कायम राखणार का? भाजपा पहिल्याच संधीत खाते खोलणार काय? समर्थ विकास पॅनेल जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.वळीवंडे गावचे सरपंचपद उपसरपंच तसेच देवगड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई यांच्या पत्नी प्रभाग एक व तीन मधून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेच्या माजी सभापती रेश्मा सावंत यांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे.सरपंचपदासाठीही तिरंगी लढतसरपंचपदासाठी समर्थ विकास पॅनेलने शरयू सावंत, शिवसेनेने अर्चना घाडी तर भाजपाने पूजा घाडी यांना उमेदवारी दिली असून भाजपाने संचिता सावंत यांचा सरपंच पदासाठी डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाने एकमेकांशी युती अथवा आघाडी केलेली नसल्याने चुरशीच्या लढती होणार आहेत.