शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चाकरमानी कोकणी मेव्याला मुकणार?, यावर्षीचा उन्हाळा मुंबईतच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 16, 2024 17:29 IST

शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान असल्याने अडचण

सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये दक्षिण कोकणातील बहुचर्चित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे मंगळवार ७ मे राेजी मतदान होणार आहे. मात्र, कोकणातील घरोघरी येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीचा उन्हाळा मुंबईतच काढावा लागणार आहे. कारण मुंबईतील सहा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे यावर्षी चाकरमान्यांना कोकणी मेव्याला मुकावे लागणार असल्याचे दिसत आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरातील एक तरी व्यक्ती उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्त मुंबईत स्थावर आहेत. मुंबई आणि उपनगरात असलेले हे सर्व चाकरमानी दरवर्षी, उन्हाळी सुट्टी, हाेळीचा सण आणि गणेशोत्सवात न चुकता कोकणात येतात. दरवर्षी उन्हाळ्यात येणारे चाकरमानी हे कोकणी मेव्याचा मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर चाकरमान्यांना गावचे वेध लागतात. यावर्षी मात्र मुंबईतील सर्वच मतदार संघात आणि ठाणे, कल्याण, पालघर या मतदार संघात २० मे ला ऐन उन्हाळ्यात मतदान होणार असल्याने मतदान होईपर्यंत चाकरमान्यांना गावी येता येणार नाही. कारण या अगोदर प्रचार आणि निवडणूक कार्यात चाकरमानी भाग घेणार आहेत.

२० मे नंतर हंगामाचा शेवटकोकणी मेव्यातील काजू, आंबा, कोकम, जांभूळ या फळांचा हंगाम साधारणपणे १५ एप्रिलनंतर सुरू होतो आणि २० मे नंतर संपायला लागतो. त्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्याचे वेध लागतात. याच दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या सरी काेसळायला सुरूवात होतात. त्यामुळे २० मे नंतर हंगाम संपतो. त्यामुळे मतदान आटोपून कोकणात येतायेता हंगाम संपणार आहे.

ऐन उन्हाळ्यात उडणार धुरळारत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर ४ जूनला मनमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. यामुळे आता मार्च, एप्रिल मे महिना पूर्ण प्रचाराचा धुरळा उडणार आहे. याच काळात जिल्ह्यात कडाक्याचा उन्हाळा असतो. यावर्षी पाणीटंचाईची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हातच प्रचारसभा आणि प्रचाराने राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेनालाेकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राउत यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडून महायुतीकडून अद्यापही कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही. भाजपा आणि शिंदे सेनेकडून या मतदार संघावर दावा दाखल केला जात आहे. मात्र, अद्याप ही जागा कोणाकडे आहे याची स्पष्टोक्ती झालेली नसल्याने याबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणElectionनिवडणूक