शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दाखले झाले आॅनलाईन; समस्या अद्याप कायम

By admin | Updated: November 5, 2014 23:38 IST

लांजा तालुका : राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात फेरफारीसाठी अडचण

लांजा : तालुक्यातील अनेक गावात साधी मोबाईलची रेंज नाही, त्या गावातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा व फेरफार उपलब्ध होताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.जनतेला आॅनलाईन संगणकीय सातबारा व फेरफार मिळावेत, यासाठी इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण डाटा संगणकात आणण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर मिळण्याची सोय १ नोव्हेंबरपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी तलाठी हाती माहिती भरुन देत होते. परंतु आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकून लागलीच मिळण्याची सोय प्रशासनाने केली आहे. त्यामुळेच राज्यात लांजा तालुका प्रथम आला आहे. दाखले आॅनलाईन देण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्व तलाठ्यांना लॅपटॉप घ्यायला लावले. प्रशासनाकडून मोडॅम ही सुविधा देण्यात आली. तलाठी कार्यालयात प्रिंटरही बसविण्यात आले. या सर्व सुविधा देण्यात आल्या. परंतु आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेटच नाही तर दाखले देणार कसे? असा प्रश्न तलाठी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. काही तलाठी कार्यालयाना स्वत:ची जागा नसल्याने भाड्याच्या खोलीत आहेत. काही कार्यालयांमध्ये लाईटची सुविधा नाही, अशी अवस्था ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांची आहे. हे सर्व मॅनेजही होईल. पण, ज्या गावात मोबाईलची संधी रेंज नाही. त्या गावात सातबारा द्यायचे कसे, असा प्रश्न तलाठ्यांना भेडसावत आहे.कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता सर्व सातबारा, फेरफार, आठ अ संगणकीकृत करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून तलाठी हाती लिखाणाचे दाखले देणे बंद करणार आहेत. मग इंटरनेटअभावी तलाठी गावातील शेतकऱ्यांना दाखले देणार कसे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपले दाखले काढण्यासाठी पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ व आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात मोबाईल रेंज तसेच इंटरनेटही नसल्याने शेतकऱ्यांसमोर समस्या उभी राहिली आहे. सातबारा आॅनलाईन करण्यात तालुका राज्यात प्रथम आल्याने तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र, सर्व पायाभूत सुविधा आहेत का? याचा विचार करुनच त्यानंतर अंमलबजावणी करणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर १ नोव्हेंबरपासून देण्यास दिमाखात प्रारंभ.आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकल्यावर दाखला मिळणे शक्य.आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेट नसल्याने गैरसोय.