शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत

By अनंत खं.जाधव | Updated: May 4, 2024 19:49 IST

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे ...

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे फलक लावले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरसमज करून देत आहेत. ते म्हणाले त्या प्रमाणे उध्दव शिवसेने कडून हे फलक लावले नसून शेतकऱ्यांमधून हे फलक लावण्यात आले असा खुलासा सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.काजूच्या हमीभावावरून लावण्यात आलेल्या फलकामुळे राजकीय मंडळी संभ्रमित झाली आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना इशारा देण्यात आला आहे. हा नुसता ट्रेलर आहे. शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत तर विधानसभेला संपूर्ण सिनेमा दाखविला जाईल असेही या पत्रकात म्हटले आहे.दीपक केसरकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केलं आहे ती शेतकऱ्यांची व कारखानदारांची बैठक लावली त्यामध्ये कमीत कमी १२० रुपये दर ठरला, हे जरी सत्य असलं तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही कारखानदाराने दीपक केसरकर सांगितल्याप्रमाणे काजू खरेदी केली नाही. उलट काजू बी बघायला नेऊन त्यामध्ये त्रुटी काढून ह्या काजू ११०-११२ रुपये प्रति किलो प्रमाणे देण्याची कारखानदारांनी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाने स्वतःच्या हिंमतीवर जिल्ह्याबाहेरील पुणे,,नासिक, आजरा, चंदगड, गोवा येथील कारखानदारांना सुमारे २३०  टनाच्या आसपास काजू १२० रुपये प्रति किलो तर काही काजू बी १२५ ते १२८ दराने विकली गेली आहे.  जिल्ह्यातील कारखानदारांना दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही, ही खरी शोकांतिका आहे. खरंतर शेतकरी संघटनेकडून जो फलक लावण्यात आला त्या सभासदांचे खरोखर कौतुक केले पाहिजे असेही सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर