शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत

By अनंत खं.जाधव | Updated: May 4, 2024 19:49 IST

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे ...

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे फलक लावले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरसमज करून देत आहेत. ते म्हणाले त्या प्रमाणे उध्दव शिवसेने कडून हे फलक लावले नसून शेतकऱ्यांमधून हे फलक लावण्यात आले असा खुलासा सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.काजूच्या हमीभावावरून लावण्यात आलेल्या फलकामुळे राजकीय मंडळी संभ्रमित झाली आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना इशारा देण्यात आला आहे. हा नुसता ट्रेलर आहे. शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत तर विधानसभेला संपूर्ण सिनेमा दाखविला जाईल असेही या पत्रकात म्हटले आहे.दीपक केसरकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केलं आहे ती शेतकऱ्यांची व कारखानदारांची बैठक लावली त्यामध्ये कमीत कमी १२० रुपये दर ठरला, हे जरी सत्य असलं तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही कारखानदाराने दीपक केसरकर सांगितल्याप्रमाणे काजू खरेदी केली नाही. उलट काजू बी बघायला नेऊन त्यामध्ये त्रुटी काढून ह्या काजू ११०-११२ रुपये प्रति किलो प्रमाणे देण्याची कारखानदारांनी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाने स्वतःच्या हिंमतीवर जिल्ह्याबाहेरील पुणे,,नासिक, आजरा, चंदगड, गोवा येथील कारखानदारांना सुमारे २३०  टनाच्या आसपास काजू १२० रुपये प्रति किलो तर काही काजू बी १२५ ते १२८ दराने विकली गेली आहे.  जिल्ह्यातील कारखानदारांना दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही, ही खरी शोकांतिका आहे. खरंतर शेतकरी संघटनेकडून जो फलक लावण्यात आला त्या सभासदांचे खरोखर कौतुक केले पाहिजे असेही सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर