शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

वायंगणीत दानपेटी पळवून रोकड लंपास

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

स्वामी समर्थ मठातील

आचरा : जिल्ह्यातील होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थंडावले असे वाटत असतानाच वायंगणी येथील आचरा-मालवण मार्गावर असलेल्या स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळविली. या दानपेटीतील सुमारे आठ ते नऊ हजारांची रोख रक्कम लंपास करत ही दानपेटी मंदिरापासून २00 फुटांवरील अंतरावर एका झाडीत फेकून दिली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वायंगणी येथील स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळवून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मठातील पुजारी रूपेश राणे हे शनिवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी लागलीच मठाच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांना दूरध्वनीद्वारे कळवून हे निदर्शनास आणून दिले. चोरीचे वृत्त समजताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या वृत्ताने स्वामीभक्तही मठाकडे धाव घेत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले मठाच्या मंडळाचे बाबू हडकर, सदा राणे, हरीष निंबाळकर, प्रमोद सावंत, बाळा राणे, आदींनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मठापासून सुमारे २०० फुटांच्या अंतरावरील झाडीत दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. चोरट्यांनी या मठाची पूर्णत: पाहणी करूनच नंतर चोरी केल्याचे निदर्शनास येत होते. या घटनेचा तपास आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. कोचरेकर व पी. एच. नाईक करीत आहेत. (वार्ताहर) ४० किलो वजनाची पेटी पळविली वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागातील बंदिस्त लोखंडी दरवाजाला असणारे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत साखळीने बांधलेली ४० किलो वजनाची दानपेटी लंपास केली. लॉकर स्वरूपाची असल्याने चोरट्यांनी पेटीच पळवून नेऊन रानमाळावर फोडल्याचे दिसून येत होते.