शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणीत दानपेटी पळवून रोकड लंपास

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

स्वामी समर्थ मठातील

आचरा : जिल्ह्यातील होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थंडावले असे वाटत असतानाच वायंगणी येथील आचरा-मालवण मार्गावर असलेल्या स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळविली. या दानपेटीतील सुमारे आठ ते नऊ हजारांची रोख रक्कम लंपास करत ही दानपेटी मंदिरापासून २00 फुटांवरील अंतरावर एका झाडीत फेकून दिली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वायंगणी येथील स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळवून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मठातील पुजारी रूपेश राणे हे शनिवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी लागलीच मठाच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांना दूरध्वनीद्वारे कळवून हे निदर्शनास आणून दिले. चोरीचे वृत्त समजताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या वृत्ताने स्वामीभक्तही मठाकडे धाव घेत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले मठाच्या मंडळाचे बाबू हडकर, सदा राणे, हरीष निंबाळकर, प्रमोद सावंत, बाळा राणे, आदींनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मठापासून सुमारे २०० फुटांच्या अंतरावरील झाडीत दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. चोरट्यांनी या मठाची पूर्णत: पाहणी करूनच नंतर चोरी केल्याचे निदर्शनास येत होते. या घटनेचा तपास आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. कोचरेकर व पी. एच. नाईक करीत आहेत. (वार्ताहर) ४० किलो वजनाची पेटी पळविली वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागातील बंदिस्त लोखंडी दरवाजाला असणारे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत साखळीने बांधलेली ४० किलो वजनाची दानपेटी लंपास केली. लॉकर स्वरूपाची असल्याने चोरट्यांनी पेटीच पळवून नेऊन रानमाळावर फोडल्याचे दिसून येत होते.