शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

वायंगणीत दानपेटी पळवून रोकड लंपास

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

स्वामी समर्थ मठातील

आचरा : जिल्ह्यातील होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थंडावले असे वाटत असतानाच वायंगणी येथील आचरा-मालवण मार्गावर असलेल्या स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळविली. या दानपेटीतील सुमारे आठ ते नऊ हजारांची रोख रक्कम लंपास करत ही दानपेटी मंदिरापासून २00 फुटांवरील अंतरावर एका झाडीत फेकून दिली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वायंगणी येथील स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळवून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मठातील पुजारी रूपेश राणे हे शनिवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी लागलीच मठाच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांना दूरध्वनीद्वारे कळवून हे निदर्शनास आणून दिले. चोरीचे वृत्त समजताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या वृत्ताने स्वामीभक्तही मठाकडे धाव घेत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले मठाच्या मंडळाचे बाबू हडकर, सदा राणे, हरीष निंबाळकर, प्रमोद सावंत, बाळा राणे, आदींनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मठापासून सुमारे २०० फुटांच्या अंतरावरील झाडीत दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. चोरट्यांनी या मठाची पूर्णत: पाहणी करूनच नंतर चोरी केल्याचे निदर्शनास येत होते. या घटनेचा तपास आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. कोचरेकर व पी. एच. नाईक करीत आहेत. (वार्ताहर) ४० किलो वजनाची पेटी पळविली वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागातील बंदिस्त लोखंडी दरवाजाला असणारे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत साखळीने बांधलेली ४० किलो वजनाची दानपेटी लंपास केली. लॉकर स्वरूपाची असल्याने चोरट्यांनी पेटीच पळवून नेऊन रानमाळावर फोडल्याचे दिसून येत होते.