शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:33 IST

पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देशेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद ग्रामस्थांना घ्यावा लागणार होडीचा आधार

बांदा : पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.याठिकाणी नदीपात्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. शेर्ले दशक्रोशीतून बांद्यात येण्यासाठी नदीपात्रात दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानाने साकवाची उभारणी करतात. डिसेंबरमध्ये साकव उभारण्यात येतो.शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना बांदा शहरात येण्यासाठी इन्सुली आरटीओ नाका येथून ३ किलोमीटर लांबीचा फेरा मारून यावे लागते. शहरात येण्यासाठी नदीपात्रातून हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याठिकाणी गेली कित्येक वर्षे पुलाची मागणी होत होती. पावसाळा संपल्यावर ग्रामस्थ याठिकाणी श्रमदानाने साकव उभारून वाहतुकीची व्यवस्था करतात. पावसाळ्यात शेर्ले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ होडीतून प्रवास करतात.

पहिल्याच पावसात तेरेखोल नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने साकव वाहून गेला. येथून जाणाऱ्या पाईपलाईनचे काम यावर्षी सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद ठेवण्यात आले होते. याठिकाणी पूल उभारल्यास दशक्रोशीतील वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.सदर पुलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा येथील ग्रामस्थांना आणखीन वर्षभर तरी पुलाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.पुढच्यावर्षी जीवघेण्या प्रवासातून मुक्तता ?येथे होणाऱ्या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. यावर्षी पावसाळ्यात चार महिने ग्रामस्थांना होडीचा प्रवास करावा लागणार आहे. पण पुढच्या वर्षी पाईपलाईनचे काम वेळेवर सुरू झाल्यास जीवघेण्या होडी प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग