शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:33 IST

पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देशेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद ग्रामस्थांना घ्यावा लागणार होडीचा आधार

बांदा : पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.याठिकाणी नदीपात्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. शेर्ले दशक्रोशीतून बांद्यात येण्यासाठी नदीपात्रात दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानाने साकवाची उभारणी करतात. डिसेंबरमध्ये साकव उभारण्यात येतो.शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना बांदा शहरात येण्यासाठी इन्सुली आरटीओ नाका येथून ३ किलोमीटर लांबीचा फेरा मारून यावे लागते. शहरात येण्यासाठी नदीपात्रातून हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याठिकाणी गेली कित्येक वर्षे पुलाची मागणी होत होती. पावसाळा संपल्यावर ग्रामस्थ याठिकाणी श्रमदानाने साकव उभारून वाहतुकीची व्यवस्था करतात. पावसाळ्यात शेर्ले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ होडीतून प्रवास करतात.

पहिल्याच पावसात तेरेखोल नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने साकव वाहून गेला. येथून जाणाऱ्या पाईपलाईनचे काम यावर्षी सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद ठेवण्यात आले होते. याठिकाणी पूल उभारल्यास दशक्रोशीतील वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.सदर पुलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा येथील ग्रामस्थांना आणखीन वर्षभर तरी पुलाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.पुढच्यावर्षी जीवघेण्या प्रवासातून मुक्तता ?येथे होणाऱ्या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. यावर्षी पावसाळ्यात चार महिने ग्रामस्थांना होडीचा प्रवास करावा लागणार आहे. पण पुढच्या वर्षी पाईपलाईनचे काम वेळेवर सुरू झाल्यास जीवघेण्या होडी प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग