शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:27 IST

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतींसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी करून त्या काबीज कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याच बरोबर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा  कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.    

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कामगार नेते आप्पा पराडकर, गीतेश कडू,राजू शेट्ये,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत  नाईक, कन्हैया पारकर, राजू राठोड, संदेश सावंत- पटेल,संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, सुदाम तेली, प्रसाद अंधारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. जनतेने टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही. आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेली चांदा ते बांदा ही योजना बंद पडली आहे. ही योजना सिंधूरत्न या नावाने सुरू करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण करणार आहे.तसेच  ही योजना चांदा ते बांदा अशीच राबवावी अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.           ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो ? हे जनतेला माहीत आहे, जनताच विरोधकांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा सोहळा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. चार नगरपंचायतीच्या व जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचा विजय होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामगार नेते आप्पा पराडकर यांनी उदय सामंत यांना स्वामी समर्थांची प्रतिमा व तलवार भेट देत सत्कार केला. संदेश पारकर व इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सत्कार केला. फोटो ओळ - कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर आयोजित सत्कार समारंभाच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना