शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:27 IST

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतींसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी करून त्या काबीज कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याच बरोबर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा  कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.    

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कामगार नेते आप्पा पराडकर, गीतेश कडू,राजू शेट्ये,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत  नाईक, कन्हैया पारकर, राजू राठोड, संदेश सावंत- पटेल,संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, सुदाम तेली, प्रसाद अंधारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. जनतेने टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही. आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेली चांदा ते बांदा ही योजना बंद पडली आहे. ही योजना सिंधूरत्न या नावाने सुरू करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण करणार आहे.तसेच  ही योजना चांदा ते बांदा अशीच राबवावी अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.           ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो ? हे जनतेला माहीत आहे, जनताच विरोधकांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा सोहळा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. चार नगरपंचायतीच्या व जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचा विजय होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामगार नेते आप्पा पराडकर यांनी उदय सामंत यांना स्वामी समर्थांची प्रतिमा व तलवार भेट देत सत्कार केला. संदेश पारकर व इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सत्कार केला. फोटो ओळ - कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर आयोजित सत्कार समारंभाच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना