शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:20 IST

भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे जठार करताहेत घाणेरडे राजकारण; आम्हांला सल्ले देऊ नका!

देवगड : एकीकडे जनता मायबाप आहे, त्यामुळे जनतेवर कारवाई करू नका, असे पोलिसांना आवाहन करायचे व दुसरीकडे सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करायचे अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण प्रमोद जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पूर्वी जठार यांना पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या देवगड येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नीतेश राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, बाळा खडपे, गणपत गावकर, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत उघड समर्थन करणाऱ्या प्रमोद जठार यांना शनिवारी गिर्ये व रामेश्वर येथील जनतेनेच जागा दाखविली. लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालत नाही हे एकजुटीने, ताकदीने उतरून जनतेने दाखवून दिले. त्या जनतेला आपला मानाचा मुजरा. रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणी माणसांवर जे लादू पहात आहेत त्यांना धडा शिकविण्याचे काम एकजुटीने संघर्ष समिती, त्या भागातील सरपंच व जनतेने करून दाखविले आहे.विजयदुर्ग रामेश्वर येथे जाऊन आपण माहिती घेतली. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांना आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांचा त्रास तसेच नोटिसा येत होत्या. तसेच आंदोलन झाल्यानंतर १३ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.एकीकडे आंदोलन करणाऱ्या मायबाप जनतेवर कारवाई करू नका, असे प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे व त्यांचे सहकारी विनंती करतात तर दुसरीकडे सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली जाते. याला काय म्हणावे? जठारांना पूर्वी पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, अशी टीका नीतेश राणे यांनी केली.जठार खोटे बोलताहेतनाणार येथील रिफायनरी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत, असे प्रमोद जठार सांगतात. मात्र, रिफायनरीसाठीच विजयदुर्ग बंदर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे जठार अजूनही खोटे बोलत आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली....तर सेनेने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेतरिफायनरी प्रकल्प रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. विधिमंडळात याच विषयावरून राजदंड पळविला. त्यामुळे जठार यांनी ही माहिती प्रथम करून घ्यावी व नंतरच आम्हांला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करा असे सल्ले द्यावेत.यापुढे सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी व भाजपा नेतेमंडळींनी सत्तेच्या माध्यमातून हा प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही अशी जनतेची भूमिका असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. चर्चेचे दरवाजा आता बंद, प्रथम प्रकल्प रद्द करा, असेही ते म्हणाले.शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, असे आव्हान नीतेश राणे यांनी दिले. प्रमोद जठार यांनी चेंबूरमध्ये झालेली दुर्घटना हा घातपात होता. त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले. मात्र, तो घातपात होता अशाप्रकारची कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. जठारांनी ही धूळफेक कशाला करावी? तशाप्रकारच्या घटना घडू नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे