शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:20 IST

भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे जठार करताहेत घाणेरडे राजकारण; आम्हांला सल्ले देऊ नका!

देवगड : एकीकडे जनता मायबाप आहे, त्यामुळे जनतेवर कारवाई करू नका, असे पोलिसांना आवाहन करायचे व दुसरीकडे सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करायचे अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण प्रमोद जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पूर्वी जठार यांना पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या देवगड येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नीतेश राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, बाळा खडपे, गणपत गावकर, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत उघड समर्थन करणाऱ्या प्रमोद जठार यांना शनिवारी गिर्ये व रामेश्वर येथील जनतेनेच जागा दाखविली. लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालत नाही हे एकजुटीने, ताकदीने उतरून जनतेने दाखवून दिले. त्या जनतेला आपला मानाचा मुजरा. रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणी माणसांवर जे लादू पहात आहेत त्यांना धडा शिकविण्याचे काम एकजुटीने संघर्ष समिती, त्या भागातील सरपंच व जनतेने करून दाखविले आहे.विजयदुर्ग रामेश्वर येथे जाऊन आपण माहिती घेतली. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांना आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांचा त्रास तसेच नोटिसा येत होत्या. तसेच आंदोलन झाल्यानंतर १३ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.एकीकडे आंदोलन करणाऱ्या मायबाप जनतेवर कारवाई करू नका, असे प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे व त्यांचे सहकारी विनंती करतात तर दुसरीकडे सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली जाते. याला काय म्हणावे? जठारांना पूर्वी पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, अशी टीका नीतेश राणे यांनी केली.जठार खोटे बोलताहेतनाणार येथील रिफायनरी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत, असे प्रमोद जठार सांगतात. मात्र, रिफायनरीसाठीच विजयदुर्ग बंदर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे जठार अजूनही खोटे बोलत आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली....तर सेनेने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेतरिफायनरी प्रकल्प रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. विधिमंडळात याच विषयावरून राजदंड पळविला. त्यामुळे जठार यांनी ही माहिती प्रथम करून घ्यावी व नंतरच आम्हांला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करा असे सल्ले द्यावेत.यापुढे सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी व भाजपा नेतेमंडळींनी सत्तेच्या माध्यमातून हा प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही अशी जनतेची भूमिका असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. चर्चेचे दरवाजा आता बंद, प्रथम प्रकल्प रद्द करा, असेही ते म्हणाले.शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, असे आव्हान नीतेश राणे यांनी दिले. प्रमोद जठार यांनी चेंबूरमध्ये झालेली दुर्घटना हा घातपात होता. त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले. मात्र, तो घातपात होता अशाप्रकारची कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. जठारांनी ही धूळफेक कशाला करावी? तशाप्रकारच्या घटना घडू नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे