शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

कालव्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण, तिलारीचे पाणी 5 एप्रिलपर्यंत ओटवणेत; गोव्याकडूनही परवानगी

By अनंत खं.जाधव | Updated: March 30, 2023 15:34 IST

सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले

सावंतवाडी : तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात झाली आहेत. त्यामुळे आता 5 एप्रिल पर्यंत पाणी ओटवणे रोणापाल, निगुडे गावापर्यंत पोहोचणार आहे. याचा फायदा सर्व गावांना होणार आहे. याबाबतची माहिती तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.तिलारीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये गुरूवार पासून २.० घमी प्रतिसेकंद वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचं विलवडे, सरमळे, इन्सुली, ओटवणे, नेतर्डे, डोंगरपाल, बांदा, वाफोली या सर्व गावांना याचा फायदा होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने व कालव्यात अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने इन्सुली सह ओटवणे निगुडे रोणापाल येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी कालव्यात बसून जलआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर कालव्यातील कामे युद्धापातळीवर पूर्ण करण्यात आली. नुकत्याच सावंतवाडीत झालेल्या आढावा बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते. तसेच लोकांची मागणी लक्षात घेता विजघर येथील विद्युत प्रकल्पाचे पाणी तत्काळ थांबवा आणि शेतकऱ्यांना तात्काळ पाणी सोडा, अशा सूचना केल्या होत्या. अभियंता कोरे यांनी याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले आहे. कालव्यातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून २६ मार्च पासून पाण्याचा विसर्ग १.० घमी प्रतिसेकंद वरून २.० घमी प्रतिसेकंद करण्यात आला आहे. आजपासून विसर्गामध्ये अजून वाढ़ करण्यात येणार आहे. यासंदर्भात गोव्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. पाण्याचा विसर्गाचा वेग वाढविण्यात आल्यानंतर ५ एप्रिल पर्यंत ४२ किलोमीटर लांबीच्या कालव्यात पाणी पोहोचणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाTilari damतिलारि धरण