शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

कालव्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण, तिलारीचे पाणी 5 एप्रिलपर्यंत ओटवणेत; गोव्याकडूनही परवानगी

By अनंत खं.जाधव | Updated: March 30, 2023 15:34 IST

सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले

सावंतवाडी : तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात झाली आहेत. त्यामुळे आता 5 एप्रिल पर्यंत पाणी ओटवणे रोणापाल, निगुडे गावापर्यंत पोहोचणार आहे. याचा फायदा सर्व गावांना होणार आहे. याबाबतची माहिती तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.तिलारीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये गुरूवार पासून २.० घमी प्रतिसेकंद वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचं विलवडे, सरमळे, इन्सुली, ओटवणे, नेतर्डे, डोंगरपाल, बांदा, वाफोली या सर्व गावांना याचा फायदा होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने व कालव्यात अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने इन्सुली सह ओटवणे निगुडे रोणापाल येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी कालव्यात बसून जलआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर कालव्यातील कामे युद्धापातळीवर पूर्ण करण्यात आली. नुकत्याच सावंतवाडीत झालेल्या आढावा बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते. तसेच लोकांची मागणी लक्षात घेता विजघर येथील विद्युत प्रकल्पाचे पाणी तत्काळ थांबवा आणि शेतकऱ्यांना तात्काळ पाणी सोडा, अशा सूचना केल्या होत्या. अभियंता कोरे यांनी याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले आहे. कालव्यातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून २६ मार्च पासून पाण्याचा विसर्ग १.० घमी प्रतिसेकंद वरून २.० घमी प्रतिसेकंद करण्यात आला आहे. आजपासून विसर्गामध्ये अजून वाढ़ करण्यात येणार आहे. यासंदर्भात गोव्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. पाण्याचा विसर्गाचा वेग वाढविण्यात आल्यानंतर ५ एप्रिल पर्यंत ४२ किलोमीटर लांबीच्या कालव्यात पाणी पोहोचणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाTilari damतिलारि धरण