शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:59 IST

लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार स्वाभिमान पक्षाची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे, प्रियाली कोदे, जितू कांबळी, हेलम कांबळी, सूरज पवार, शिवसुंदर देसाई, समर्थ कोळंबकर, बुथअध्यक्ष भक्ती राणे, अंकिता कर्पे, सुरेखा चव्हाण, भारती पाटील, उज्वला ताम्हाणेकर, शुभम देसाई, विराज येडे, चैतन्य मामजी आदी उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा हाणामाऱ्या व राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सावंतवाडी तालुक्यात गृहराज्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञातांनी पेटवून दिली आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यादृष्टीने गंभीर असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आपला तालुका संभाळू शकत नाहीत. हे यावरून स्पष्ट झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात अशा प्रकारे बदनामी होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे व लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पाडावी यासाठी कणकवली शहरासह तालुक्यात पोलिसांच्या रात्र गस्तीच्या वेळेत वाढ करावी. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण कलुषित करून पराभवाच्या भीतीने अशा अनुचित घटना करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी.कणकवली शहरात यापूर्वी गाड्या जाळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार पुन्हा शहरात व तालुक्यात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात सावंतवाडीतील घटनेचा संशय सत्ताधाऱ्यांच्या दिशेने व्यक्त होत असल्यामुळे हे प्रकरण दडपले जाण्याची भीती आहे.

तसेच अश्या घटना वारंवार जिल्ह्यात घडत असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा घटना घडू नये व शहरातील महिलांना भयमुक्त वातावरणात शहरात फिरता यावे म्हणून कणकवली पोलिसांनी तातडीने गस्तीत वाढ करावी. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग