शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:59 IST

लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाळण्याचे, हाणामारीचे प्रकार रोखा : संजिवनी पवार स्वाभिमान पक्षाची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक जाहीर झल्यानंतर जिल्ह्यात गाड्या जाळण्याचे व हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. हे गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.अशी मागणी स्वाभिमान पक्षाच्या शहरअध्यक्षा संजिवनी पवार यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, संदीप मेस्त्री,अण्णा कोदे, प्रियाली कोदे, जितू कांबळी, हेलम कांबळी, सूरज पवार, शिवसुंदर देसाई, समर्थ कोळंबकर, बुथअध्यक्ष भक्ती राणे, अंकिता कर्पे, सुरेखा चव्हाण, भारती पाटील, उज्वला ताम्हाणेकर, शुभम देसाई, विराज येडे, चैतन्य मामजी आदी उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा हाणामाऱ्या व राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सावंतवाडी तालुक्यात गृहराज्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञातांनी पेटवून दिली आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यादृष्टीने गंभीर असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आपला तालुका संभाळू शकत नाहीत. हे यावरून स्पष्ट झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात अशा प्रकारे बदनामी होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे व लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पाडावी यासाठी कणकवली शहरासह तालुक्यात पोलिसांच्या रात्र गस्तीच्या वेळेत वाढ करावी. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील वातावरण कलुषित करून पराभवाच्या भीतीने अशा अनुचित घटना करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी.कणकवली शहरात यापूर्वी गाड्या जाळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार पुन्हा शहरात व तालुक्यात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात सावंतवाडीतील घटनेचा संशय सत्ताधाऱ्यांच्या दिशेने व्यक्त होत असल्यामुळे हे प्रकरण दडपले जाण्याची भीती आहे.

तसेच अश्या घटना वारंवार जिल्ह्यात घडत असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा घटना घडू नये व शहरातील महिलांना भयमुक्त वातावरणात शहरात फिरता यावे म्हणून कणकवली पोलिसांनी तातडीने गस्तीत वाढ करावी. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग