शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाळ्यात डोंगर खचू नये यासाठी संरक्षक भिंत उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:40 IST

गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी दाभिल नदीचे पात्र वाढविले पाहिजे तसेच पुन्हा डोंगर खचू नये यासाठी नदीपात्रालगत संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशा मागण्या केल्या.

ठळक मुद्देपावसाळ्यात डोंगर खचू नये यासाठी संरक्षक भिंत उभाराविनायक राऊत यांची सूचना : अधिकाऱ्यांसह दाभिल गावाला भेट

सावंतवाडी : गतवर्षीच्या महापुरात दाभिल रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी इतरांचा असलेला संपर्कच तुटला होता. या रस्त्याची खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी दाभिल नदीचे पात्र वाढविले पाहिजे तसेच पुन्हा डोंगर खचू नये यासाठी नदीपात्रालगत संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशा मागण्या केल्या.खासदार विनायक राऊत यांनी दाभिल गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, ठेकेदार बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.गतवर्षीच्या महापुरात दाभिल गावाला जोडणारा रस्ता नदीत वाहून गेला होता. त्यामुळे गावाशी होणारा संपर्क पूर्णपणे तुटला होता. बांधकाम विभागाने त्यावेळी तात्पुरती डागडुजी केली होती. त्यानंतर या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम हाती घेण्यात आले होते. याची पाहणी खासदार राऊत यांनी केली.

यावेळी ग्रामस्थ आबा घाडी यांच्यासह अनेकांनी नदीवरच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात यावी तसेच नदीतील दगड काढून पात्र रिकामे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. वाढीव कामाबाबत आपण स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले तसेच कामाची माहिती घेतली. तसेच पावसात पुन्हा डोंगर खचला जाऊ नये म्हणून संरक्षक भिंत घाला. त्याचा प्रस्ताव द्या. तसेच मी स्वत: पाटबंधारे विभागाशी चर्चा करीन, असेही खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत