शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साटेलीतील बीएसएनएल सेवा विस्कळीत

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

अशा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जेव्हा कारवाईची वेळ येते, तेव्हा त्या कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात.

गजानन बोंद्रे- साटेली भेडशी -परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. ग्राहकांकडून स्थानिक स्तरावर अनेक तक्रारी होऊनही त्यावर आजपर्यंत सुधारण्याच्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. याचा नाहक त्रास गरीब जनतेला सहन करावा लागत आहे. एका ठिकाणी ग्राहकांच्या हिताचे आणि हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अनेक कायदे केले जातात. मात्र, याच कायद्याद्वारे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होत आहे किंवा नाही, याची खात्री मात्र नक्कीच देता येणार नाही. कारण अशा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जेव्हा कारवाईची वेळ येते, तेव्हा त्या कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात. यातून शेवटी ग्राहकांना मात्र न्याय न मिळता त्यांची अधिकच पिळवणूक होते. सद्य:स्थितीत साटेली भेडशी परिसरात अनेक दूरध्वनी बंद स्थितीत आहेत. बंद असलेल्या दूरध्वनी ग्राहकांनी वेळोवेळी तक्रारी देऊनही सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे कामगार ग्राहकांजवळ अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत. परिणामी ग्राहकांची दूरध्वनी सेवा बंद असून, बिले मात्र न चुकता येत आहेत. यामुळे अनेक ग्राहकांचा कंपनीबाबतचा संताप वाढत आहे. या परिसरात अनेक असे ग्राहक आहेत, जे बीएसएनएलच्या सेवांना पुरेपूर कंटाळलेले आहेत. सेवा बंद असताना बिले का भरावीत, असा प्रश्न ग्राहकांमधून विचारला जात आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी आलेले कंपनीचे कामगार ग्राहकांना विचित्र प्रकारची उद्धट उत्तरे देतात. तसेच ग्राहकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पूर्वीच्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याने या परिसरात कामगारांची उणीव भासत असून, त्यामुळे येथील ग्राहकांना या कंपनीच्या सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच विनाकारण मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कंपनीने दिलेली दूरध्वनी सेवेतील इन्स्ट्रूमेंट साध्या कंपनीची असून, ती वरचेवर खराब होतात. याची तक्रार दिली असता, कंपनीचे कामगार येऊन दुरुस्ती अथवा इन्स्ट्रूमेंट न बदलता ग्राहकांना नको ती उत्तरे देतात. दुरुस्ती होणार नाही किंवा याला अनेक महिने जातील, असे सांगून ग्राहकांनाच नवीन इन्स्ट्रूमेंट घेण्याचा सल्ला देतात. सेवा देणाऱ्या कंपनीने अशी इन्स्ट्रूमेंट योग्य वेळी बदलून देऊन किंवा दुरुस्ती करून देऊन ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड पडणार नाही, याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी सर्व ग्राहकांमधून होत आहे. कंपनीची केबल या परिसरात अनेक ठिकाणी जमिनीवर पडलेली असून, त्यामुळेच या केबलच्या चोरीत वाढ होऊन याचा नाहक त्रास कंपनीबरोबरच ग्राहकांनाही सोसावा लागत आहे. कं पनीचे सध्याचे कामगार ग्राहकांच्या समस्यांकडे आणि तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. या सर्वांची कंपनीच्या वरिष्ठांमार्फत योग्य चौकशी होऊन ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, त्यांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांना विनाकारण कोणताही आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांमधून होत आहे. बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबरच भ्रमणध्वनी सेवाही फारच विस्कळीत झालेली असून, या सेवेला ग्राहक फारच कंटाळलेले आहेत. भ्रमणध्वनीवर बोलता-बोलता रेंज गायब होणे, आवाज न येणे, सेवा बंद होणे आणि बऱ्याचवेळा फोन न लागणे, अशा विचित्र प्रकारांनी या परिसरातील ग्राहक फारच हैराण झाला असून, यावर वरिष्ठांमार्फत योग्य अशी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे. कंपनीची दूरध्वनी सेवा पूर्णपणे खराब असून, अनेक ग्राहक ही सेवा बंद करण्याच्या मार्गावर आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय, असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.सेवा कायमची बंद करण्याच्याच विचारातमाझ्या घरातील आणि दुकानातील दूरध्वनी सेवा अनेक महिन्यांपासून बंद असून, वेळोवेळी तक्रार देऊनही ती सेवा आजपर्यंत सुरू झालेली नाही. अनेक महिने उलटूनही सेवा बंद असतानाही बिले मात्र दर महिन्याला येतच असून, मला हा नाहक त्रास आणि भुर्दंड पडत आहे. दूरध्वनी सेवा लवकरात लवकर सुरू न झाल्यास ती कायमची बंद करण्याचा विचार करीत आहे. - कमलाकांत मोरजकर, दुकान व्यावसायिक, भेडशी