शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

Sindhudurg: नारुर समतानगर येथील पूल आठ दिवसांपासून पाण्याखाली, गावाशी संपर्क तुटला; नागरिकांचे हाल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 12, 2024 18:57 IST

रजनीकांत कदम कुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून ...

रजनीकांत कदमकुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या समतानगर येथील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा डोंगर भागातील गावांना बसला आहे. यात नारुर गावाचाही समावेश असून, येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या वाडीतील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने नारुर गडनदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याची दखल कोणीही घेतलेली नाही. ग्रामपंचायतीकडूनही दखल घेण्यात न आल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.पुलावर पाणी असल्याने गावापासून संपर्क तुटला आहे, प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून येथील लोक पुलावरून ये - जा करताहेत. रांगणा गड परिसरात मोठा पाऊस दरवर्षी पडत असतो. मात्र, येथील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पुलावर पाणी येथे व येथील लोकांचा गावाशी संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी व येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे.येथील मुसळधार पाऊस व नदीला आलेला पूर यामुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस