शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नारुर समतानगर येथील पूल आठ दिवसांपासून पाण्याखाली, गावाशी संपर्क तुटला; नागरिकांचे हाल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 12, 2024 18:57 IST

रजनीकांत कदम कुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून ...

रजनीकांत कदमकुडाळ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नारुर येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या समतानगर येथील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा डोंगर भागातील गावांना बसला आहे. यात नारुर गावाचाही समावेश असून, येथील समतानगरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आठ दिवसांपासून या वाडीतील लोकांचा संपर्क गावापासून तुटला आहे. त्यामुळे येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत.डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने नारुर गडनदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याची दखल कोणीही घेतलेली नाही. ग्रामपंचायतीकडूनही दखल घेण्यात न आल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.पुलावर पाणी असल्याने गावापासून संपर्क तुटला आहे, प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून येथील लोक पुलावरून ये - जा करताहेत. रांगणा गड परिसरात मोठा पाऊस दरवर्षी पडत असतो. मात्र, येथील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पुलावर पाणी येथे व येथील लोकांचा गावाशी संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी व येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे.येथील मुसळधार पाऊस व नदीला आलेला पूर यामुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस