शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आडाळीच्या जिवनदायी ओढ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:53 IST

घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग  या सेवाभावी संस्थेने प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या आडाळी जिवनदायी ओढा पुनरुज्जीवन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला

ठळक मुद्देआडाळीच्या जिवनदायी ओढ्याने घेतला मोकळा श्वासघुंगुरकाठीच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

(आडाळी दोडामार्ग) सिंधुदुर्ग : घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग  या सेवाभावी संस्थेने प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या आडाळी जिवनदायी ओढा पुनरुज्जीवन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सुमारे शंभर जणांच्या दिवसभराच्या परिश्रमानंतर गेली वीसपंचवीस वर्षे झाडझाडोरा, गाळ, कचरा, मातीने घुसमटलेला ओढ्याचा श्वास मोकळा झाला. पानवळ-बांदा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी ही किमया करुन दाखवली.दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. आडाळी येथील ग्लोब ट्रस्टचे अध्यक्ष पराग गावकर, सर्वोन्नत्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रविण गावकर यांनी ती उचलून धरली.

पानवळ (बांदा) येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० स्वयंसेवक यात उत्साहाने सहभागी झाले. आडाळी गावातील युवकांनीही चांगला प्रतिसाद दिला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून दिवसभरात ओढ्याचे रुपच पालटून गेले. प्रवाह बंद पडलेला हा ओढा सायंकाळी खळाळून वाहू लागला. गावातील बागायती, पाणीपातळी राखण्यामध्ये आतापर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.सकाळी नऊ वाजता सर्वजण गावातील माऊली मंदिरात एकत्र झाले. सतीश लळीत यांनी सर्वांना जलसंवर्धनाचे महत्व सांगून उपक्रमाचा उद्देश विशद केला. गोगटे-वाळके महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. के. के. म्हेत्रे, पराग गावकर यांनी आवश्यक सुचना दिल्या आणि साडेनऊच्या सुमारास सर्व पथकाने श्रमदानाला सुरुवात केली.

सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या या ओढ्यातील वाढलेली झाडी, तसेच पात्रातील लाकडे, कचरा आधी साफ करण्यात आला. नंतर फावडे व घमेल्यांच्या सहाय्याने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली.ओढ्यातील ज्या भागातील काम मानवी शक्तीच्या पलिकडील होते, त्याठिकाणी जेसीबी यंत्राची मदत घेण्यात आली. सायंकाळी ओढ्यावर वनराई बंधारा घालण्यात आला. गेली कित्येक वर्षे या ओढ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने गाळ व कचऱ्याने भरलेले ओढ्याचे पात्र व झरे मोकळे झाल्याने ओढ्याचे पात्र सफाईनंतर पाण्याने भरुन गेले.

सायंकाळी काम संपल्यानंतर सर्वजण  घुंगुरकाठी भवनमध्ये एकत्र जमले. यावेळी घुंगुरकाठी, ग्लोब ट्रस्ट यांच्यावतीने जेसीबी चालक अनिल राठोड यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

पात्रात अडकलेली मोठमोठी झाडे यादव यांनी कौशल्याने बाहेर काढली. सहभागी एनएसएस विद्यार्थ्यांचा प्रतिकात्मक सत्कार प्रा. म्हेत्रे यांना शाल देऊन करण्यात आला. राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर गावकर, संदीप गावकर यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनsindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान