शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचे मृतदेह आज बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आंबोली : गडहिंग्लजमधून वर्षा पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीत बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. मंगळवारी दोघेही पर्यटक मृतावस्थेत कावळेसादच्या आठशे फूट खोल दरीत असलेल्या नदीच्या प्रवाहात आढळून आले आहेत. यातील एकाचा मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न शोधपथकाने केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ...

ठळक मुद्देइम्रानचे तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
लोकमत न्यूज नेटवर्कआंबोली : गडहिंग्लजमधून वर्षा पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीत बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. मंगळवारी दोघेही पर्यटक मृतावस्थेत कावळेसादच्या आठशे फूट खोल दरीत असलेल्या नदीच्या प्रवाहात आढळून आले आहेत.यातील एकाचा मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न शोधपथकाने केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दाट धुके तसेच ज्या नदीपात्रात हा मृतदेह आहे, तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने मृतदेह वर आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही शोधमोहीम थांबविण्यात आली असून, बुधवारी मृतदेह वर आणण्यात येणार आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील अत्याळ येथील नंदिनी पोल्ट्रीमध्ये काम करणारे श्रीधर मगदूम, रमेश देसाई, राजेश चोरगे, अवधूत देवरकर, इम्रान गार्दी, प्रताप राठोड हे युवक व त्यांच्यासोबत पोल्ट्रीमालक दयानंद पाटील आंबोली येथे कारने वर्षा पर्यटनासाठी आले होते. या गु्रपने धनगरमोळा येथील धरणावर तसेच अन्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर सोमवारी ५ वाजण्याच्या सुमारास कावळेसाद येथे ते आले होते. तेथे यातील युवकांनी आणलेले जेवण घेण्याचा निर्णय घेतला. तर इम्रान गार्दी (२३ रा. हुनगीहाळ, ता. गडहिंग्लज-कोल्हापूर) व प्रताप राठोड (मराठवाडा-बीड) यांनी जवळच फिरून येतो म्हणून सांगून ते गेले ते आलेच नाहीत. सोबतच्या युवकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कावळेसाद येथे फिरायला आलेल्या एका पर्यटक महिलेला दोन युवक खोल दरीत पडताना दिसले होते. त्यामुळे ती तशीच ओरडत पार्किंगच्या दिशेने गेली. तेथे असलेल्या पर्यटकांनी धावाधाव केली. त्यांच्या त्यावेळी सोबत असलेल्या युवकांना इम्रान व प्रताप कुठे दिसत नसल्याने तेच दोघे दरीत पडले असावेत, असा त्यांचा समज झाला. सायंकाळ झाल्याने तसेच दाट धुके असल्याने खोल दरीत काही दिसत नव्हते. पण एक लाल शर्ट दिसत असल्यामुळे युवकांनी आपला मित्रच असल्याचे सांगितले. मात्र, रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.पुन्हा मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम हाती घेण्यात आली. यात हिल राइडर्स एंड हायकर्स, समिट अँडव्हेंचर्स कोल्हापूर, बाबल आल्मेडा यांची सांगेली व आंबोली येथील आपत्कालीन टीम सहभागी झाली होती. तर ११ वाजण्याच्या सुमारास खास क्रेनही मागविण्यात आली. काही युवकांनी कावळेसाद पॉर्इंटच्या पायथ्याला शिरशिंगे-पारपोलीतून पायी चालत जाण्याचे निश्चित केले. या सर्वांनी जोरदार शोधमोहीम राबविल्यानंतर दुपारच्या सुमारास एक मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. तर दुसरा मृतदेह सांगेलीच्या दिशेने नदी प्रवाहातून वाहत चालल्याचे शोध पथकातील काही युवकांनी पाहिले. जोरदार पाऊस तसेच दाट धुके यामुळे हाती आलेला मृतदेह वर आणणे शोधपथकाला शक्य झाले नाही.त्यामुळे आता बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. शोधपथकांना दोन्ही मृतदेह दिसले असल्याने हे मृतदेह वर आणणे एवढेच शोधपथकांच्या हाती आहे. कावळेसादच्या वरच्या भागातून ही दरी तब्बल आठशे फूट खोल आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आतमध्ये पडल्यानंतर ती जिवंत मिळणे कठीण होते. त्यातच मोठमोठे दगड व घनदाट जंगल असल्याने वरून पडलेली व्यक्ती सरळ पायथ्याला नदीत फेकली जाते. तसाच प्रकार या दोन युवकांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे त्यांना वाचविणेही अशक्य बनले होते.वेगवेगळ््या शोधपथकांनी राबविली शोधमोहीमहिल राइडर्स एंड हायकर्स, समिट अँडव्हेंचर्स कोल्हापूरचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बकरे, विनायक काणेकर, मयूर लवटे, सचिन नरके, प्रसाद अडनाईक, वैभव जाधव, बाबल आल्मेडा यांची सांगेली आपत्कालीन टीम यामध्ये बाबल आल्मेडा, किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, पंढरीनाथ राऊळ, फिलिप आल्मेडा, संतान आल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, सुमन राऊळ, बाबुराव कविटकर, अबीर आंचेकर, कृष्णा राऊळ, सुरेश राऊत तसेच आंबोली आपत्कालीन टीमचे शंकर गावडे, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री आदी सहभागी झाले होते. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, कॉन्स्टेबल गुरुदास तेली, प्रकाश कदम, गजानन देसाई, कोलगोंडा आदी सहभागी झाले होते.इम्रानचे तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्नइम्रान याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. तो पाच वर्षांपासून अत्याळ येथील नंदिनी पोल्ट्रीमध्ये कामाला होता. तर प्रताप राठोड हा मराठवाडा-बीड येथील आहे. तो ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात आला, तो पुन्हा गावी गेलाच नाही. दीड वर्षापासून या पोल्ट्रीमध्ये कामाला लागला होता. गडहिंग्लज तो येथे एकटाच राहात आहे.बांधकामचे दुर्लक्ष अनेकांच्या मृत्यूचे कारणआंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेले रेलिंग भरपूर खाली आहे. तसेच तेथे जे पाईप टाकण्यात आले आहेत, त्यांच्यावरही बांधकाम करणे गरजेचे आहे. अनेकजण त्यातून वाहून गेले आहेत. तर हे दोन युवक रेलिंगवरून खाली पडले. त्यामुळे बांधकाम विभागाने बांधलेले रेलिंग उंच करणे गरजेचे होते. पण तसे न केल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.