शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे.

ठळक मुद्दे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोंबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे. या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन व्यवस्थापक कुलकर्णी यांनी दिली. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातून मुंबईला फक्त 1 तास 25 मिनिटांत हे विमान पोहोचणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे आणि सिंधुदुर्ग हून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. हे विमान ७० वाहन क्षमता असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

१ तास २५ मिनिटात मुंबई

यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.

सिंधुदुर्गातून इतर शहरांमध्ये जाण्याची संधी

सिंधुदुर्गातून मुंबईला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्या मुंबई विमानतळावरून विमानसेवा असतात‌. त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवा असतात. त्यामुळे या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातही जाण्याची सोय 

सिंधुदुर्ग एअरपोर्टवर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्‍या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे. चिपीवरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो.

विमानाची ऑनलाईन बुकिंग सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे.आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे. यासाठी प्रवाशांनीSDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Airportविमानतळsindhudurgसिंधुदुर्गChipi airportचिपी विमानतळMumbaiमुंबई