शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून विमानाचे बुकिंग सुरू, फक्त दीड तासांत मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे.

ठळक मुद्दे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोंबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे. या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन व्यवस्थापक कुलकर्णी यांनी दिली. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातून मुंबईला फक्त 1 तास 25 मिनिटांत हे विमान पोहोचणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे आणि सिंधुदुर्ग हून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. हे विमान ७० वाहन क्षमता असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

१ तास २५ मिनिटात मुंबई

यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.

सिंधुदुर्गातून इतर शहरांमध्ये जाण्याची संधी

सिंधुदुर्गातून मुंबईला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे आणि त्यानंतर ज्या मुंबई विमानतळावरून विमानसेवा असतात‌. त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवा असतात. त्यामुळे या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातही जाण्याची सोय 

सिंधुदुर्ग एअरपोर्टवर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्‍या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे. चिपीवरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो.

विमानाची ऑनलाईन बुकिंग सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे.आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे. यासाठी प्रवाशांनीSDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Airportविमानतळsindhudurgसिंधुदुर्गChipi airportचिपी विमानतळMumbaiमुंबई