शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

त्या पुस्तकावर बंदी घालावी  : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:56 IST

काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या पुस्तकावर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

मालवण : काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने कुडाळ-मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना मालवण तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी देसाई, मधुसूदन सारंग, अशोक ओटवणेकर, चंद्रकांत भोजने, अनिकेत फाटक आदी उपस्थित होते.

वीर सावरकर कितने वीर? या पुस्तकात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशहितासाठी व देशाच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. लेखकाने सावरकर व नथुराम गोडसे यांच्याविषयी चुकीची व अश्लाघ्य माहिती पुस्तकातून प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी.यापुढे सावरकर यांचाच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी शासनाने नवीन कायदा बनवावा. त्यात कठोर कारवाईची व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असावी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तत्काळ भारतरत्न म्हणून जाहीर करावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीsindhudurgसिंधुदुर्ग