शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:16 IST

fruits Sindhudurg- राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात ! प्रकिया उद्योग उभारण्याची मागणी : सरकारची अनास्था कारणीभूत

अनंत जाधवसावंतवाडी : राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.गोवा आणि केरळ राज्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांना काजू बीला हमीभाव दिला आहे. केरळ राज्याचे काजू बोर्डाची कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहेत. मात्र महाराष्ट्रात काजूला हमीभाव नाही आणि मागणी असूनही काजू बोर्ड निर्माण झालेले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काजू बोंडूवर प्रक्रिया उद्योग नसल्याने ही बोंडू गोवा राज्यात निर्यात केला जातात. या बोंडूंना एका डब्यामागे १३ रुपये, तर दोडामार्ग भागांमध्ये किलोमागे २० किंवा २५ पैसे असा दर मिळतो. गोवा राज्यातील काजू फेणी किंवा काजू मद्यनिर्मिती प्रकल्पधारक कारखानदार दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू बागायतीमधून ही बोंडूप्रक्रियेसाठी घेऊन जातात. या काजू बोंडापासून मद्यार्क निर्माण करतात. काजू प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी राजकीय आशीर्वादाची गरज आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडूवर प्रक्रिया होत नाहीत.कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडूवर प्रक्रिया करणारी छोटी छोटी यंत्रे तयार केली आहेत.मात्र त्यावर आधारित शासनाच्या सबसिडीसह उत्पादन आणि मार्केटिंगबाबत योजना नसल्यामुळे काजू बोंडू गोव्यातील कारखानदारांच्या दरानुसार विकावी लागत आहेत, असे काजू बागायतदार शेतकरी बोलताना सांगतात.काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखी भरगोवा राज्यात महागड्या मद्यार्क निर्मितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडू फायदेशीर ठरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. फक्त श्रेयासाठी राजकारण तापले जाते, पण शेतकरी बागायतदार मात्र चिंताग्रस्त बनले आहेत.या हंगामात पर्यावरणातील बदल व अवकाळी पावसाने काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग