शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

काळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:22 IST

वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही.

सावंतवाडी : वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी फक्त विषय समजावून घेण्यापूर्वी त्यात ढवळाढवळ करत आहेत. मलेशियाची वाळू जिल्ह्यात आणून जिल्ह्याची अधोगती करायची आहे का? असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमानचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, नगरसेवक राजू बेग, सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, सुधीर आडिवरेकर, विनायक ठाकूर, बांदा उपसरपंच अक्रम खान,  दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, नारायण राणे पालकमंत्री असताना कधी सिंधुदुर्गमध्ये वाळूसाठी आंदोलने होत नव्हती. पण आता सतत आंदोलने सुरू आहेत. पालकमंत्र्यांसह शिवसेना, भाजपच्या नेते मंडळींना प्रशासनातील काही समजत नाही. त्यामुळे एखादा विषय वाढत जात आहे. वाळू आंदोलन चिघळण्यामागे पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. त्यांना वाळूवाल्यांनी गेल्यावर्षी काळे झेंंडे दाखवले. त्याचा ते राग काढत आहेत. त्यामुळेच वाळू पट्टे लिलाव थांबले आहेत. असा राग काढणे योग्य नाही. पण मंत्री केसरकर यांची ही जुनी सवय आहे, अशी टीका यावेळी माजी खासदार राणे यांनी केली आहे. आता वाळू पट्टे लिलावाचा विषय मार्गी लावला आहे. मेरीटाईम बोर्डाचे सीईओ विक्रम कुमार यांनी यात लक्ष घातल्याने आता लिलाव प्रकिया जलद होईल. हा प्रश्न मी मार्गी लावला आहे. म्हणून श्रेय घेणार नाही. वाळू सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.मच्छीमार आंदोलनात पालकमंत्री केसरकर यांनी चार दिवसांपूर्वी फक्त चर्चा केली. त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. मग मार्ग कसा काय निघू शकतो? मच्छीमार आंदोलनात गोव्याची सरळ भूमिका आहे. गोवा शासन महाराष्ट्राच्या अन्न-औषध प्रशासनासोबत चर्चा करण्यास तयार आहे. पण मंत्री केसरकर हे त्यांच्या संपर्कात राहत नाहीत, असे खुुद्द गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपल्याशी बोलले असल्याचे माजी खासदार राणे यांनी सांगितले. मी शनिवारी सायंकाळी गोव्यात त्यांची भेट घेतल्याचेही राणे यांनी सांगितले.राणे कुटुंबावर टीका करणा-या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कर्तृत्व काय? असा सवाल माजी खासदार राणे यांनी केला आहे. स्वत:च्या जीवावर पाच ग्रामपंचायत जिल्ह्यात ते निवडून आणू शकले नाहीत. त्यांनी राणेंवर टीका करावी यात दुर्दैव ते काय आणि राणे यांनी कधीही उपरकर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले नव्हते, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग