शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST

राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

कणकवली : शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका केली आहे. सुशांत नाईक जर असे म्हणत असतील कि, राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका बसला आहे. हे मात्र सत्य आहे. असा टोला भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.नगरसेवक तथा सिंधुदुर्गं जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी बुधवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर संतोष कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी घडल्यानंतर नाईक कंपनीने सतीश सावंत यांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून पण बाजूला केले आहे हे दिसून येते. दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून प्रमोद वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून ? त्याचबरोबर ते राजन तेली यांच्या पराभवाचे बोलत असतील तर, आमदार वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे.  आपल्या विजयाची गाथा जनतेला तुम्ही सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूतीवर आपण निवडून आलात हे विसरू नका.तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी राजन तेली यांच्या घरी का आले ? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलावे. तरच त्यांना पुढील दिवस चांगले जातील असेही संतोष कानडे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना