शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST

राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

कणकवली : शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका केली आहे. सुशांत नाईक जर असे म्हणत असतील कि, राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका बसला आहे. हे मात्र सत्य आहे. असा टोला भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.नगरसेवक तथा सिंधुदुर्गं जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी बुधवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर संतोष कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी घडल्यानंतर नाईक कंपनीने सतीश सावंत यांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून पण बाजूला केले आहे हे दिसून येते. दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून प्रमोद वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून ? त्याचबरोबर ते राजन तेली यांच्या पराभवाचे बोलत असतील तर, आमदार वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे.  आपल्या विजयाची गाथा जनतेला तुम्ही सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूतीवर आपण निवडून आलात हे विसरू नका.तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी राजन तेली यांच्या घरी का आले ? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलावे. तरच त्यांना पुढील दिवस चांगले जातील असेही संतोष कानडे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना