शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST

राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

कणकवली : शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका केली आहे. सुशांत नाईक जर असे म्हणत असतील कि, राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका बसला आहे. हे मात्र सत्य आहे. असा टोला भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.नगरसेवक तथा सिंधुदुर्गं जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी बुधवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर संतोष कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी घडल्यानंतर नाईक कंपनीने सतीश सावंत यांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून पण बाजूला केले आहे हे दिसून येते. दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून प्रमोद वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून ? त्याचबरोबर ते राजन तेली यांच्या पराभवाचे बोलत असतील तर, आमदार वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे.  आपल्या विजयाची गाथा जनतेला तुम्ही सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूतीवर आपण निवडून आलात हे विसरू नका.तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी राजन तेली यांच्या घरी का आले ? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलावे. तरच त्यांना पुढील दिवस चांगले जातील असेही संतोष कानडे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना