शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 20, 2022 18:43 IST

आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल १८० ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही नारायण राणे आणि पर्यायाने भाजपचा करिष्मा पहायाला मिळाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने ७२ जागा मिळवत व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. भाजप, शिवसेनेपाठोपाठ ग्रामविकास पॅनलने ५० जागा मिळवत मोठी झेप घेतली आहे. नव्याने उदययास आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या साथीने १५ ग्रामपंचायती विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही.

या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी आमदार नितेश राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदार संघात मोठी आघाडी घेतली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी कुडाळ, मालवण या आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघात मालवणात ३० आणि कुडाळमध्ये २८ ग्रामपंचायती पटकावून मोठे यश मिळविले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

मोठ्या, प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायती भाजपाकडे

कणकवली तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कलमठ, वागदे, फोंडाघाट, नांदगाव, कळसुली, तळेरे, कासार्डे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, केसरी, माजगाव. देवगड तालुक्यातील किंजवडे, कोटकामते, विजयदुर्ग, वाघोटन. मालवण तालुक्यातील धामापूर, गोठणे, वडाचापाट, हिवाळे, असगणी, मालोंड अशा मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपचे कमठ फुलले आहे.

नितेश राणेंचा करिष्मा

भाजपाचे कणकवली मतदार संघातील आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे.

मंत्री दीपक केसरकरांना भाजपाची साथ

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातील दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडीत भाजपाच्या साथीने चांगले यश मिळविले असले तरी त्यांच्या मतदार संघातील अनेक गावात ठाकरे शिवसेनेनेही आघाडी घेतली आहे.

वैभव नाईक यांना धक्का

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मालवण तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात भाजपाने मोठी बाजी मारली आहे. मालवण तालुक्यात ५५ पैकी ३० ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. तर कुडाळ तालुक्यातही भाजपाने चांगले यश मिळवित ५४ पैकी २८ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

एकुण ग्रामपंचायती ३२५पक्षनिहाय

भाजपा : १८०ठाकरे सेना : ७२

ग्रामविकास : ५०शिंदे सेना : १५

अपक्ष : ४राष्ट्रवादी : २

रिक्त : २काँग्रेस : ० 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपा