शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 22:09 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला. या वक्तव्यावर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गिर्ये रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करुन जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला. या वक्तव्यावर भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर गिर्ये रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने निषेध करुन जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा भाजपानेच आणला आहे आणि तो पूर्णत्वास नेणारही अशी वल्गना दोन दिवसांपूर्वी केली होती. या वक्तव्याचा निषेध करत गिर्ये गावच्या ग्रामस्थांनी व संघर्ष समितीने गिर्ये कँटींग येथे मंगळवारी प्रमोद जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले. यावेळी ग्रामस्थांनी प्रमोद जठार मुदार्बाद अशा घोषणाही देण्यात आल्या.यावेळी गिर्ये गावचे संघर्ष समितीचे अध्यक्ष मुनाफ ठाकुर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, आरिफ बगदादी, बबन घाटये, प्रभाकर देवळेकर, शरजु घाटये, अतुल आंबेरकर, संदिप डोळकर, रामचंद्र शिर्के व बहुसंख्य गिर्ये-रामेश्वर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना गिर्ये ग्रीन रिफायनरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मुनाफ ठाकुर म्हणाले कि, गिर्ये-रामेश्वर गावामध्ये होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दोन्ही गावे संघर्ष करुन तो हटविण्यासाठी लढा देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी या ठिकाणी ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच केलेले हे वक्तव्य म्हणजे येथील जनतेवरती आघातच केल्यासारखा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग हे गाव असून या ठिकाणी पर्यटनाचे प्रकल्प शासनाने व जठारांनी आणावे त्यांना आम्ही मोफत जमीन द्यायला तयार आहोत.  मात्र विनाशकारी आणि येथील आंबा पिक नष्ट करणारे प्रकल्प आणू नयेत. जठार यांना या प्रकल्पामधून कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. म्हणूनच ते हा प्रकल्प व्हावा असे सांगत आहेत. स्वार्थापोटी व स्वत:ला मिळणा-या फायद्यासाठी जठार हे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.संदिप डोळकर म्हणाले, माजी आमदार प्रमोद जठार यांना येथील जनतेने आमदार म्हणून निवडून दिले होते. त्या आमदारकीच्या काळात त्यांनी एकाही व्यक्तीला व बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्पातून १ लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बेताल वक्तव्य करुन येथील जनतेची दिशाभुल करीत आहेत. जठार यांनी गिर्ये गावात येऊनच दाखवावेस्वत:चे राजकिय अस्तित्व व विधान परिषदेवरती आमदारकी व कोट्यवधी रुपये प्रकल्पातून मिळण्याच्या आशेनेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असल्याचे बेताल वक्तव्य जठार करीत आहेत. त्यांना येथील जनता कधीही क्षमा करणार नसून यापुढील जठार यांनी गिर्ये गावामध्ये येऊनच दाखवावे असे आव्हान डोळकरसह तेथील उपस्थित ग्रामस्थांनी केले आहे.जनता आता गप्प बसणार नाहीयावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा पवार म्हणाल्या की, ग्रीन रिफायनरी प्रकल्पापेक्षा प्रमोद जठार हेच विनाशकारी आहेत. येथील लोकांचा विनाश करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. यामुळे येथील जनता आता गप्प बसणार नसून प्रकल्प याठिकाणी कदापी होऊ देणार नाही. आणि प्रमोद जठार यांनाही गिर्ये गावामध्ये पाय ठेवू देणार नाही असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग