शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वणव्यामुळे जैवविविधता नष्ट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

वनसंपदा बेचिराख : वणवे लावणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

सुभाष कदम - चिपळूण तालुक्यात आजही वणवे लावण्याचे प्रकार सुरुच आहेत. या वणव्यामुळे वनसंपदा बेचिराख होत असून, डोंगर काळेकुट्ट दिसत आहेत. त्यामुळे वन्य प्राणीही अडचणीत येऊ लागले आहेत. जैवविविधता नष्ट होत असल्याने वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.उन्हाळ्यात चिपळूण परिसरात पर्यटनासाठी बाहेरगावाहून अनेक पर्यटक येतात. मात्र, याच काळात वणवे लावण्याचे प्रमाणही जास्त असते. वणव्यामुळे विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, फुलझाडे, शेतीसाठीचे गवत, कवळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. लहान मोठे जीव व वन्य प्राणीही या वणव्याच्या तडाख्यातून सुटत नाहीत. त्यामुळे वन्य प्राण्याच्या अनेक प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक पक्ष्यांची घरटी, अंडी हेही यातून वाचत नसल्याने पक्ष्यांच्या दुर्मीळ जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आंबा, ऐन, किंजळ, करवंदीची झुडपं, उंबर आदी अनेक जंगली झाडे जळून खाक होतात. साप, ससे, लांडगा, भेकर, कोल्हे, रानकुत्रे, मोर आदी वन्य प्राणीही नष्ट होत आहेत. कोकणामध्ये साधारणता जानेवारी महिना संपला की, विघ्नसंतोषी लोक आगी लावण्याचे काम करतात. वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत याबाबत कोणावरही कारवाई झालेली नाही. वणवा लावणाऱ्याचे नाव सांगणाऱ्यालाही बक्षीस जाहीर करण्यात आले होते. परंतु, वन खात्याची योजना केवळ कागदावर राहिली आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनस्तरावरच यासाठी कठोर पावले उचलून अंमलबजावणी झाली तरच काहीअंशी यावर नियंत्रण येईल. सध्या शेती करण्याचे प्रमाण घटल्याने जमीन मोठ्या प्रमाणात पडीक राहाते. या जमिनीत गवत वाढते आणि त्या गवताला वणवे लावले जातात. या वणव्यात कोणाचे नुकसान होईल, याचा साधा विचारही केला जात नाही. यामुळे नाराजी आहे. शासनस्तरावर अशा कठोर उपायांची मागणी केली जात असली तरी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची काहींनी तक्रार केली आहे. कोकणात वणवा लावण्याचे काम गेली कित्येक वर्षे केले जात आहे. अनेक डोंगरात ही परिस्थिती निर्माण होत असल्याने काहिंनी चिंता व्यक्त केली आहे. वनकायदे वेळोवेळी जाहीर झाले. मात्र, वणवे लावणाऱ्यांवर किती प्रमाणात कारवाई केली गेली आहे, याबाबतची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत आहे.