शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट; गोवा सरकारची इन्सुलेट वाहन सक्तीवरून मुस्कटदाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 19:07 IST

गोवा शासनाने मासळी वाहतूक करणा-या वाहनांची एफडी नोंदणी बंधनकारक करताना इन्सुलेट वाहन सक्तीचे केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट ओढवले आहे. 

सिंधुुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हे ताज्या मासळीचे माहेरघर आहे. शिवाय येथील समुद्रात मिळणा-या मासळीला ‘मालवणी’ चव असते. निर्यात करण्यायाजोगी मासळी मालवणसह देवगड व वेंगुर्ले तालुक्यातील मच्छिमारांना मिळते. परकीय चलन मिळवून देणाºया या मत्स्य व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज मासळी मार्केट नसल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या गोवा राज्यावर मत्स्य व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागत आहे. गोवा शासनाने मासळी वाहतूक करणा-या वाहनांची एफडी नोंदणी बंधनकारक करताना इन्सुलेट वाहन सक्तीचे केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, गोवा राज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सामोपचाराने तोडगा काढावा. गोवा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील मच्छिमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला न गेल्यास गोवा सरकारच्या विरोधात दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मत्स्य व्यापा-यांनी दिला आहे. त्यामुळे गोवा सरकारने इन्सुलेट वाहनांची केलेली सक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. गोवा राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करता मत्स्य व्यापारावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यात प्रामुख्याने गोव्यात मासळी वाहतूक करणाºया वाहनांना एफडी नोंदणी म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून इन्सुलेट पद्धतीची वाहनांची बांधणी करणे सक्तीचे केले. त्यामुळे गोवा सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. येथील मासळी वाहतूक करणारी वाहने ही इन्सुलेट करू शकत नाही. मत्स्य हंगामापुरता मासळी वाहतूक करणाºया वाहनाचा वापर केला जातो. उर्वरित हंगामात ती वाहने दुसºया कामासाठी वापरण्यात येत असल्यामुळे इन्सुलेट पद्धतीने वाहन बांधणे जिकरीचे असून व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढवली आहे. 

१५ दिवस मासळी वाहतूक पूर्णत: ठप्पसिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्याला निर्यात करण्यात येणारी मासळी वाहतूक २६ आॅक्टोबरपासून पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यापाºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोवा सरकारने गोवा पोलिसांना एफडी नोंदणी व इन्सुलेट वाहने नसल्यास प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश दिल्याने ‘गोयकरां’ना मालवणी मासळीची चव गेले १५ दिवस अनुभवता आलेली नाही. जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे इन्सुलेटच्या सक्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. 

बेळगाव, मुंबई मार्केटचा आधारजिल्ह्यातील रापण तसेच छोट्या पातींच्या साहाय्याने उपलब्ध होणारी मासळी मत्स्य व्यावसायिकांकडून विकत घेत ती गोव्यातील कंपन्यांना पाठविली जाते. त्याचबरोबर नौकांच्या माध्यमातून उपलब्ध होणारी मासळी काही मत्स्यव्यावसायिक स्वत: कंपन्यांना थेट पाठवितात; मात्र गोव्यातील बंदीमुळे त्यांना बेळगाव, मुंबई यासारख्या मार्केटचा आधार घ्यावा लागत आहे. गोव्याच्या मासळी वाहतूक बंदीचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य व्यापाºयांना बसला आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग