शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट; गोवा सरकारची इन्सुलेट वाहन सक्तीवरून मुस्कटदाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 19:07 IST

गोवा शासनाने मासळी वाहतूक करणा-या वाहनांची एफडी नोंदणी बंधनकारक करताना इन्सुलेट वाहन सक्तीचे केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट ओढवले आहे. 

सिंधुुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हे ताज्या मासळीचे माहेरघर आहे. शिवाय येथील समुद्रात मिळणा-या मासळीला ‘मालवणी’ चव असते. निर्यात करण्यायाजोगी मासळी मालवणसह देवगड व वेंगुर्ले तालुक्यातील मच्छिमारांना मिळते. परकीय चलन मिळवून देणाºया या मत्स्य व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज मासळी मार्केट नसल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या गोवा राज्यावर मत्स्य व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागत आहे. गोवा शासनाने मासळी वाहतूक करणा-या वाहनांची एफडी नोंदणी बंधनकारक करताना इन्सुलेट वाहन सक्तीचे केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांवर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, गोवा राज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सामोपचाराने तोडगा काढावा. गोवा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील मच्छिमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला न गेल्यास गोवा सरकारच्या विरोधात दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मत्स्य व्यापा-यांनी दिला आहे. त्यामुळे गोवा सरकारने इन्सुलेट वाहनांची केलेली सक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. गोवा राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करता मत्स्य व्यापारावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यात प्रामुख्याने गोव्यात मासळी वाहतूक करणाºया वाहनांना एफडी नोंदणी म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून इन्सुलेट पद्धतीची वाहनांची बांधणी करणे सक्तीचे केले. त्यामुळे गोवा सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. येथील मासळी वाहतूक करणारी वाहने ही इन्सुलेट करू शकत नाही. मत्स्य हंगामापुरता मासळी वाहतूक करणाºया वाहनाचा वापर केला जातो. उर्वरित हंगामात ती वाहने दुसºया कामासाठी वापरण्यात येत असल्यामुळे इन्सुलेट पद्धतीने वाहन बांधणे जिकरीचे असून व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढवली आहे. 

१५ दिवस मासळी वाहतूक पूर्णत: ठप्पसिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्याला निर्यात करण्यात येणारी मासळी वाहतूक २६ आॅक्टोबरपासून पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यापाºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोवा सरकारने गोवा पोलिसांना एफडी नोंदणी व इन्सुलेट वाहने नसल्यास प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश दिल्याने ‘गोयकरां’ना मालवणी मासळीची चव गेले १५ दिवस अनुभवता आलेली नाही. जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे इन्सुलेटच्या सक्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. 

बेळगाव, मुंबई मार्केटचा आधारजिल्ह्यातील रापण तसेच छोट्या पातींच्या साहाय्याने उपलब्ध होणारी मासळी मत्स्य व्यावसायिकांकडून विकत घेत ती गोव्यातील कंपन्यांना पाठविली जाते. त्याचबरोबर नौकांच्या माध्यमातून उपलब्ध होणारी मासळी काही मत्स्यव्यावसायिक स्वत: कंपन्यांना थेट पाठवितात; मात्र गोव्यातील बंदीमुळे त्यांना बेळगाव, मुंबई यासारख्या मार्केटचा आधार घ्यावा लागत आहे. गोव्याच्या मासळी वाहतूक बंदीचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य व्यापाºयांना बसला आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग