शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांवर सामंतांचा पलटवार

By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST

रत्नागिरी : नेत्यांमध्ये कलगी-तुरा रंगला; बाळ मानेंवरही टीकास्त्र--रणसंग्राम

रत्नागिरी : माझ्यावर गद्दारीचा आरोप करणारे आमदार भास्कर जाधव जेव्हा राष्ट्रवादीत आले तेव्हा आधी सेना नेत्यांच्या मांडीवर त्यांनी घाण केली नाही काय, असा सवाल करीत भास्कर जाधव हेच गद्दारीचे महामेरू आहेत, असा पलटवार आमदार उदय सामंत यांनी आज त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी सायंकाळी शहरातील राजिवडा येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांनी आमदार उदय सामंत यांच्या गद्दारीवरून जोरदार टोलेबाजी केली होती. राष्ट्रवादीत पुढे पुढे असणाऱ्या उदय सामंत यांना सेनेच्या रांगेत शेवटी उभे राहावे लागते आहे. सेनेत बाकी सर्व वाघ; तर सामंत यांचे मांजर झाले आहे आणि त्यांना हीच मोठी शिक्षा असल्याचा टोला आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारसभेत लगावला होता. जाधव यांच्या आरोपांवर आज सामंत यांनी पत्रकारपरिषदेत पलटवार केला. त्यांच्या गद्दारीचा पाढा वाचला. खरेतर जाधव हेच गद्दारांचे महामेरू आहेत. कारण त्यांनी अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत रमेश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी लढत असताना त्यांनी समांतर आघाडी उभी केली व राष्ट्रवादीच्या विरोधात गद्दारी केली. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपासून जाधवांच्या आघाडीचे नगरसेवक दूर राहिले होते. अनिल तटकरेंच्या विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही जाधवांनी अनेकांना राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करायला लावून पक्षाशी गद्दारीच केली, असे ते म्हणाले. ढोल वाजवण्याच्या मुद्द्याचाही सामंत यांनी समाचार घेतला. आम्ही रत्नागिरीकर स्वत:च्या मालकीचे ढोल स्वत:च्या गळ्यात घालून वाजवतो. दुुसऱ्याच्या खर्चाने आणलेले ढोल वाजवत नाही, हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आताही तेच होणार आहे, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांना लगावला. भाजपचे प्रवक्ते बाळ माने यांच्यावर हल्लाबोल करताना सामंत म्हणाले, आम्हाला दलबदलू म्हणणारे माने हे तीनवेळा पराभूत झाले आहेत. मच्छिमार संघाच्या १८ मतांच्या निवडणुकीतही ते पराभूत झाले. पोटनिवडणुकीत चारही उमेदवारांची जप्त होणारी अनामत वाचवून दाखवा, असे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)+त्यांचा अपमानच...राजिवड्यातील राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत तेथील राष्ट्रवादीचे नगरसेवक सईद पावसकरांना व्यासपीठावर स्थानच दिले गेले नाही. बशीर मुर्तुझा यांना कोपऱ्यातील खुर्चीत बसवून उमेश शेट्येंनी नेत्यांच्या शेजारची खुर्ची पटकावली, हासुध्दा बशीर मुर्तुझा यांचा अपमानच आहे.कुवत ओळखूनच मंत्रीपदमी राज्यमंत्री असताना माझी कुवत ओळखूनच मला राष्ट्रवादीत पालकमंत्रीपद मिळाले. जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असूनही जाधव यांना त्यांची कुवत नसल्यानेच पुन्हा पालकमंत्रीपद मिळाले नाही. सामंत पालकमंत्री झाले म्हणून आपण कोणतीही तक्रार न करता कॅबिनेट मंत्री असूनही गप्प राहिल्याचे जाधव म्हणत आहेत, हे हास्यास्पद आहे.