शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नेमाडेंना औरंगजेबाची महती वाढवायची आहे, असे प्रकार खपवून घेणार नाही - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: August 8, 2023 16:59 IST

अशा लोकांचे पुरस्कार परत घ्यावेत

कणकवली:  छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. अशा लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि यापूर्वी दिले असतील तर ते परत घ्यावेत अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.आमदार राणे यांनी आज, मंगळवारी कणकवली येथील निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले औरंगजेबाने जुलूम केले, अत्याचार केले. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजायचे आणि छत्रपतींना इतिहासात लहान करायचे असे जे षडयंत्र चालू आहे. त्याला भालचंद्र नेमाडे हे खतपाणी घालत आहेत. औरंगजेब हिंदू द्वेषी नव्हता असे सांगून नेमाडे यांना औरंगजेबाची महती वाढवायची आहे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असेही ते म्हणाले.मातोश्रीचा टोल बंद झाल्याने मुंबईचे टोल आठवले ते पुढे म्हणाले, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असेल. मातोश्रीचा टोल बंद झाल्याने आदित्य ठाकरे यांना आता मुंबईचे टोल आठवले आहेत. मात्र, मातोश्री २ कोणाच्या पैशातून बांधली. गुजराती आणि मारवाडी समाजाचे पैसे किती लागले याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आव्हान नितेश राणे यांनी यावेळी दिले.महायुतीचीच सत्ता येणार अमित शहा  हे २०२४ मध्ये पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतील, कारण महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज