शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

भराडीच्या चरणी भक्तांची मांदियाळी

By admin | Updated: March 2, 2017 23:38 IST

लाखो भाविक नतमस्तक : मोडयात्रेने आज सांगता

आंगणेवाडी (ता. मालवण) : आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. गुरुवारी पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली.मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे यात्रा सुरळीत पार पडली. यात पोलिस प्रशासन, ग्रामस्थ मंडळ तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चोख नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते. यात्रेत अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये यासाठीही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे राजकीय नेते तसेच सिनेकलाकार यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.आंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र दहा रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. आज, शुक्रवारी मोडयात्रेने आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.(प्रतिनिधी)फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करेल : विनोद तावडेआई भराडीच्या कृपाआशीर्वादामुळे भाजपला गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत भरभरून यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काम करण्याच्या धडाक्यामुळे भाजपचा राज्यातील वारू सुसाट सुटला आहे. कोणी काहीही म्हणो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यात पाच वर्षे यशस्वी पूर्ण करेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.राजकीय नेत्यांची उपस्थितीआंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी ५ ते १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार अ‍ॅड. अनिल परब, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अनेक राजकीय नेते देवीचरणी लीन झाले.खाजाची आवक वाढलीआंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारच्या सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली.आम्ही सामना जिंकला : शेलारमुंबई महापालिकेत भाजपला सत्ता मिळण्यासाठी भराडी देवीकडे नवस बोललो होतो. अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला सामना आम्ही जिंकला आहे. पारदर्शी आणि भ्रष्टाचारविरहित कारभार केला जाईल. मुंबईचा महापौर कोणाचा बसणार याबाबतचा निर्णय भाजप कोअर कमिटी घेईल, असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.