शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी होण्याचा मानस बाळगा

By admin | Updated: December 31, 2015 23:56 IST

दत्तात्रय शिंदे : जामसंडे येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवगड : भारत महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपण भविष्यातील अधिकारी असल्याचा मानस बाळगला पाहिजे. विवेकबुद्धीने अभ्यासाकडे लक्ष देऊन मनापासून विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे, तरच भारत लवकरात लवकर महासत्ता म्हणून नावारूपास येऊ शकतो, असे मत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील सांस्कृतिक भवनामध्ये श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, संस्थेचे उपाध्यक्ष नारायण घाडी, स्नेहलता देशपांडे, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, मुख्याध्यापक विजयकुमार हिरवे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश गोगटे, पर्यवेक्षक माधव खाडीलकर, शाळा समिती अध्यक्ष सुजाता गोगटे, प्रसाद मोंडकर, संतोष कुळकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी शिंंदे म्हणाले की, विद्यार्थी वर्गाने अधिकाधिक अभ्यासामध्ये मेहनत घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. देवगड जामसंडेचे विद्यार्थी हे नक्कीच देशाचे सनदी अधिकारी बनू शकतात. अशी क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांना चालना देण्यासाठी शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांबद्दलची योग्य जबाबदारी पार पाडली पािहजे. तसेच गाव, शाळा व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये विद्यार्थ्यांनीही सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. स्वच्छता ही नेहमीच पारदर्शकता दाखविते. यामुळे जनतेनेही आपल्या कामातील वेळ बाजूला ठेवून स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी हे भविष्यकाळाचे नागरिक असणार आहेत. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाचा आतापासून विचार केला पाहिजे. तरच पुढील काळात सुरक्षा ही किती महत्त्वाची असते, हे दिसून येणार आहे. ज्या नागरिकांना समुद्रकिनारी वा अन्य ठिकाणी कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली, तर तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे. हे एक सज्जन भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ते आपण बजावले पाहिजे.विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा, तशी मूर्ती घडते. या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य आकार दिला पाहिजे व विद्यार्थ्यांनीही लोक काय करतात यापेक्षा आपण योग्यप्रकारे कोणते काम केले पाहिजे, अशा विवेकबुद्धीनेही काम केले, तर भारत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असे मत दत्तात्रय शिंंदे यांनी व्यक्त केले. बक्षीस वितरणचे वाचन विनायक ठाकूर, संजय गोगटे यांनी सूत्रसंचालन, माधव खाडीलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) मोठा समुद्र किनारा : पोलिसांना सहकार्य करासिंंधुदुर्ग जिल्ह्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचा आतंकवादी हे घातपात घडविण्यासाठी वापर करीत असतात. अशा पद्धतीत आतापर्यंत नागरिकांनी अलर्ट राहून जे काम केले तसेच काम यापुढेही केले पािहजे. पोलीस हे नेहमीच आपले कर्तव्य बजावतच असतात.पोलिसांना जनतेने सहकार्य केले पाहिजे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे प्रतिपादन.