शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

अधिकारी होण्याचा मानस बाळगा

By admin | Updated: December 31, 2015 23:56 IST

दत्तात्रय शिंदे : जामसंडे येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवगड : भारत महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपण भविष्यातील अधिकारी असल्याचा मानस बाळगला पाहिजे. विवेकबुद्धीने अभ्यासाकडे लक्ष देऊन मनापासून विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे, तरच भारत लवकरात लवकर महासत्ता म्हणून नावारूपास येऊ शकतो, असे मत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील सांस्कृतिक भवनामध्ये श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, संस्थेचे उपाध्यक्ष नारायण घाडी, स्नेहलता देशपांडे, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, मुख्याध्यापक विजयकुमार हिरवे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश गोगटे, पर्यवेक्षक माधव खाडीलकर, शाळा समिती अध्यक्ष सुजाता गोगटे, प्रसाद मोंडकर, संतोष कुळकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी शिंंदे म्हणाले की, विद्यार्थी वर्गाने अधिकाधिक अभ्यासामध्ये मेहनत घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. देवगड जामसंडेचे विद्यार्थी हे नक्कीच देशाचे सनदी अधिकारी बनू शकतात. अशी क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांना चालना देण्यासाठी शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांबद्दलची योग्य जबाबदारी पार पाडली पािहजे. तसेच गाव, शाळा व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये विद्यार्थ्यांनीही सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. स्वच्छता ही नेहमीच पारदर्शकता दाखविते. यामुळे जनतेनेही आपल्या कामातील वेळ बाजूला ठेवून स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी हे भविष्यकाळाचे नागरिक असणार आहेत. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाचा आतापासून विचार केला पाहिजे. तरच पुढील काळात सुरक्षा ही किती महत्त्वाची असते, हे दिसून येणार आहे. ज्या नागरिकांना समुद्रकिनारी वा अन्य ठिकाणी कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली, तर तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे. हे एक सज्जन भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ते आपण बजावले पाहिजे.विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा, तशी मूर्ती घडते. या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य आकार दिला पाहिजे व विद्यार्थ्यांनीही लोक काय करतात यापेक्षा आपण योग्यप्रकारे कोणते काम केले पाहिजे, अशा विवेकबुद्धीनेही काम केले, तर भारत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असे मत दत्तात्रय शिंंदे यांनी व्यक्त केले. बक्षीस वितरणचे वाचन विनायक ठाकूर, संजय गोगटे यांनी सूत्रसंचालन, माधव खाडीलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) मोठा समुद्र किनारा : पोलिसांना सहकार्य करासिंंधुदुर्ग जिल्ह्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचा आतंकवादी हे घातपात घडविण्यासाठी वापर करीत असतात. अशा पद्धतीत आतापर्यंत नागरिकांनी अलर्ट राहून जे काम केले तसेच काम यापुढेही केले पािहजे. पोलीस हे नेहमीच आपले कर्तव्य बजावतच असतात.पोलिसांना जनतेने सहकार्य केले पाहिजे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे प्रतिपादन.