शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
4
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
5
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
6
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
7
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
8
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
9
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
10
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
11
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
12
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
13
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
14
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
15
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
16
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
17
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
18
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
19
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
20
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

By सुधीर राणे | Updated: May 4, 2023 17:05 IST

सत्तेसाठी लाचार झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला

कणकवली: बारसू येथे मोठा घातपात होण्याची शक्यता आहे, जिलेटिन स्फोटके येत आहेत' असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. केवळ उद्धव ठाकरे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटण्यासाठी बारसू येथे येत असल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे नीलेश राणेंची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी  खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.कणकवली विजय भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.सत्तेसाठी रिफायनरी प्रकल्पाची दलालीविनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार आहेत. जे उदय सामंत आणि राणे कुटुंबीय विनाकारण काळ्या मांजरीप्रमाणे या दौऱ्याच्या आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची लफडी पुढील काळात बाहेर काढणार आहे. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, रिफायनरी हा प्रकल्प कोकणातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्यामुळे माझा त्याला विरोध असणार आहे. मात्र, आता सत्तेसाठी लाचारी झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.नीलेश राणे उच्च स्तरीय चौकशी व्हावी बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांची वेदना ऐकण्यास उद्धव ठाकरे ६ मे  रोजी तिघे जाणार आहेत. त्यावेळी सर्व गावांतील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ येणार आहेत. लोक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांना भेटणार म्हणून भाजपाच्या काळ्या मांजरानी जिलेटीन स्फोटकांचा साठा आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. नीलेश राणे यांच्याकडे स्फोटकांची सखोल माहिती असेल तर त्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी.

४३ लोकांची सरकारने तडीपारी केलीआता त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त असून स्थानिक, जनता सायकल देखील नेऊ शकत नाही. नीलेश राणे आणि भाजपचे लोक या रिफायनरीची दलाली करीत आहेत. त्यादृष्टीने पोलिस अधिक्षकांनी याची दखल घ्यावी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष जावून स्थानिकांशी अद्याप संवाद साधन्याची हिमंत केलेली नाही. तेथील ४३ लोकांची सरकारने तडीपारी केली आहे, असा आरोप खासदर राऊत यांनी यावेळी केला.

उदय सामंतांकडून कोट्यवधीचा भ्रष्टाचार उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यापासून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करत आहेत. रत्नागिरीत ६० कोटीच्या त्यांच्याच कंपनीने केलेला रस्त्यावर आता १०० कोटीचा सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मुळात पाच वर्ष देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडे असताना हा प्रस्ताव कशासाठी?आम्हाला धमक्या दिल्या आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्याचे उद्योग मंत्री ग्रामस्थांशी संवाद साधन्यासाठी गेले नाहीत. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांची चौकशी लावा. रिफायनरी होवो अथवा न होवो. पण लोकांचे डोके फोडायचे असा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.रिफायनरीला विरोध नाही, पण.. - वैभव नाईक जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणाहून  राणेंना हाकलून लावण्यात आले. हे लोकांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे बारसू येथे येणार आहेत. त्यांना कोण अडविण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्याच पध्द्तीने उत्तर देणार आहे. मोर्चा काढला तर शिवसेना तेवढ्याच ताकदीने उत्तर देईल. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही गप्प बसणार नाही. रिफायनरीला आमचा विरोध कधीही नाही. आमचे म्हणणे आहे की, तेथील लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करा. आम्ही लोकांसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांना बारसू येथे येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प