शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:28 IST

निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू.

कणकवली : विजयदुर्ग किल्ला पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी सन २०१४ ते २०२१ या कालावधीत ५० लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा खर्च करूनही तेथील स्थितीत काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे या निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू. तसेच केंद्रीय पर्यटनमंत्र्यांपर्यंत हा विषय पोचवून अधिकार्‍यांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट यांनी दिला आहे.कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते राजेंद्र पाटील, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ऍड. कावेरी राणे या उपस्थित होत्या.यावेळी ऍड. कावेरी राणे म्हणाल्या,  हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीतून असे दिसून येते की ,वर्ष २०१४- २०१५ मध्ये ६७,३३८रुपये, वर्ष  २०१५-१६ मध्ये ३,५६,७१८  रुपये, वर्ष २०१६-१७ मध्ये ३,८६,०१२रुपये, वर्ष २०१७-१८ मध्ये  ७,१२,२०४ रुपये, वर्ष २०१८-१९ मध्ये १२,५१,५९८ रुपये, वर्ष २०१९-२०  मध्ये ११,७६,११३ रुपये, तर वर्ष २०२०-२१ मध्ये १०,६६,४२२रुपये खर्च करण्यात आले.म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळजवळ १ लाख रुपये खर्च होऊनही किल्ल्याची एवढी दुरावस्था कशी रहाते ? पुरातत्व विभागाने हा निधी नेमके कुठे खर्च केला ? हिंदु विधीज्ञ परिषदेने वर्ष २००० पासूनचा पहाणी अहवाल मागितला असतांनाही केवळ एकाच वर्षीचा अहवाल देण्यात आला. यावरून २० वर्षांत एकदाच किल्ल्याची पहाणी करणार्‍या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना गड-किल्ल्यांविषयी कसलीच आस्था नाही हेच यातून दिसून येते.किल्ल्यावर राज्य शासनाचे ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ मोडकळीस आलेले एक अतिथीगृह आहे. या संदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाने पहाणी केल्यावर पुरातत्व विभागाच्या अनुमतीशिवाय किल्ल्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे एकतर ते तोडून टाकावे अथवा राज्य सरकारने पुरातत्व विभागाकडून त्याची अनुमती घ्यावी , असे नमूद केले आहे. याचा अर्थ पुरातत्व विभाग ३० वर्षे काय करत होता?दर महिन्याला जवळजवळ १ लाख रुपयांचा निधी मिळत असतांना किल्ल्यावर झाडे-झुडपे कशी काय रहातात ? स्वछतागृहा सारख्या सुविधा का निर्माण होत नाहीत? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड