शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक पदी अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:38 IST

Bjp Sindhudurg : २०२४ साली निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपाने 'समर्थ बूथ अभियान' ची सुरूवात केली आहे.  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक पदी अतुल काळसेकर 'समर्थ बूथ अभियान'अंतर्गत नियुक्ती

कणकवली : २०२४ साली निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपाने 'समर्थ बूथ अभियान' ची सुरूवात केली आहे.  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

६ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानात राज्यातील ९३ हजार बुथची रचना पूर्ण किंवा पुनर्गठीत होणार आहे. यासाठी पक्षातील अनुभवी आणि संघटन कौशल्य असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकेका लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे.सिंधुदुर्गातील अनेक निवडणुकींचा अनुभव आणि संघटन कौशल्याची खुबी असलेल्या अतुल काळसेकर यांना या लोकसभेच्या सहाही विधानसभेतील १९३५ बुथची रचना पूर्ण करावयाची आहे. त्या अनुषगाणे सिंधुदुर्गातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. कणकवली येथे प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,संघटन सरचिटणीस जयदेव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा बैठकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभेतील बूथ रचना पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बूथ रचना संयोजक महेश सारंग यांच्या नियोजनातून जिल्ह्यातील शक्तिकेंद्र आणि बुथवरील बैठका सुरू झाल्या आहेत.गेल्या अनेक निवडणुकामध्ये रत्नागिरी -सिंधुदुर्ग(पूर्वीचा राजापूर) हा मतदार संघ शिवसेना भाजपाच्या मदतीने जिंकत आलेली आहे.युतीच्या बंधनात या ठिकाणी स्वबळावर लढायची संधी भाजपाला आजवर मिळालेली नाही. यावेळी निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याचीही संधी भाजपाला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाने मतदारसंघात भाजपाची ताकद वाढलेली असून पूर्वीचा पारंपरिक भाजपा मतदार आणि राणेंसोबत भाजपाच्या प्रवाहात सामील झालेले मतदार यांची संख्या सहज साडे चार लाखांपर्यंत जाते. जी विजयासाठी आवश्यक मानली जात आहे. यासाठी प्रत्येक बुथवरील पक्षाचे संघटन मजबूत करणे ही मोठी जबाबदारी आहे.

प्रत्येक बुथवर किमान ३० जणांची समिती गठीत करण्यात येणार असून त्यात युवा,महिला तसेच सर्व सामाजिक घटकांना सामावून घेण्यात येणार आहे.या लोकसभा मतदार संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ९१६ बूथ तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १०१९ बूथ आहेत.या बूथ रचनेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समन्वयक नियुक्त केलेला असून खाली मंडलस्तर आणि शक्तिकेंद्र स्तरापर्यंत विस्तारक नेमलेले आहेत.

या अभियानात नारायण राणे,रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव प्रमोद जठार,निलेश राणे,जेष्ठ नेते बाळ माने,आमदार नितेश राणे,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन या सहकाऱ्यांसह आणि लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिधी यांच्या सहभागाने लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर हे अभियान शंभर टक्के यशस्वी करणार असल्याची माहिती जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.पंतप्रधान साधणार राज्यातील बूथ अध्यक्षांशी संवाद !या अभियानाच्या काल निश्चितीला एक वेगळे महत्व आहे.६ जुलै हा जनसंघाचे पहिले अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिवस आहे तर १७ सप्टेंबर हा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस आहे. १७ सप्टेंबर या अभियान समाप्ती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील सुमारे ९३ हजार बूथ अध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAtul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग