शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:18 IST

women and child development Zp Sindhudurg-जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न : म्हापसेकर तोंडवळी येथे जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

ओरोस : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० महिलांसाठी तलंग योजना आणली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करताना जिल्ह्यातील मुलांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमात दिली.जिल्हा परिषद शेष फंडातून जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शुक्रवारी मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील साईसागर रिसॉर्टमध्ये झाले. याचे उद्घाटन अध्यक्ष म्हापसेकर यांच्याहस्ते करण्यात आले.

आयुष्यात प्रशिक्षण महत्त्वाचे असते. प्रशिक्षणातून ज्ञान मिळते, समाजाच्या विकासाची माहिती मिळते. त्यातून विकास करणे सोपे जाते, असे सांगतानाच, जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. कोकणात याचा फायदा करून घेतला पाहिजे, असेही म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सरपंच आबा कांदळकर आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांनी, ग्रामीण विकास, बांबू लागवड व जलजीवन मिशन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, संजना सावंत, उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, मनस्वी घारे, सावी लोके, शर्वाणी गावकर, श्रिया सावंत, समिधा नाईक, मानसी जाधव, संजय देसाई, अनघा राणे, जेरॉन फर्नांडिस, रवींद्र जठार, विष्णुदास कुबल, गणेश राणे, मालवण पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर, गायत्री ठाकुर, विनोद आळवे, अशोक बागवे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ५० जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे किमान ४० सदस्य प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचा एकही सदस्य आलेला नाही. ते ठरवून आले नाहीत का ? ते समजू शकलेले नाही, असेही राजेंद्र म्हापसेकर यांनी यावेळी सांगितले. पाटील, देवधरांचे मार्गदर्शनयावेळी जिल्ह्यातील स्वयंरोजगाराच्या नवीन वाटा या विषयावर प्रशिक्षण देताना मिलिंद पाटील यांनी, बांबू लागवडीला १९९५ पासून प्राधान्य सुरू झाले आहे. या लागवडीत कमी मेहनतीत जास्त आर्थिक लाभ मिळतो. जिल्ह्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, असे सांगत माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी, राजकीय लोकांनी काम करताना सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रित करून विकास साधण्यासाठी धोरण बदलले पाहिजे, असे आवाहन केले. 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासzpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग