शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

भात खरेदी तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

By admin | Updated: May 20, 2015 23:58 IST

विनायक राऊत, वैभव नाईक : पावसाळा तोंडावर, शेतकरी अडचणीत

सिंधुदुर्गनगरी : पावसाळा तोंडावर आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे तत्काळ भात खरेदी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी येत्या चार दिवसात कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन भात खरेदी तातडीने करतो, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदी तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत खासदार राऊत व आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाध्यक्ष सुरेश शिरसाट, नागेंद्र परब व अन्य उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील या हंगामातील शेतकऱ्यांकडील भात खरेदी न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेती बागायतदारांचे झालेले नुकसान व दुसरीकडे शेतात पिकलेले भात घरात पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे नित्याचे खर्च भागविणे मुश्किल झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात भरडला जाण्याची शक्यता आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही वस्तुस्थिती लक्षात घेता या जिल्ह्यातील अन्य कोणत्याही शेतकऱ्यावर अशी पाळी येवू नये म्हणून तत्काळ शेतकऱ्यांकडील भात खरेदी होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता कुडाळ व इतर शासकीय गोदामे ताब्यात घेऊन तातडीने भात खरेदी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारवर टीका करत आता कुठे गेले अच्छे दिन? असे सांगत आरोप केला होता.याबाबत खासदार राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मोदी सरकारने एक वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कामे केली. स्वातंत्र्यकाळानंतर आजपर्यंत हजारो कायद्यांचा उपयोग होत नाही हे लक्षात येताच आतापर्यंत मोदी सरकारने दोन विधेयके आणून तब्बल ३५०० कायदे कालबाह्य केले. त्यामुळे लोकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान विमा योजना लागू केली. तसेच पूर्वी अवकाळी पाऊस किंवा कोरडा दुष्काळ पडला तर ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळत होती.आता तर ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत लागू करण्याचा निर्णय झाला असून तसा सर्व्हेही करायला सुरुवात झाली आहे. यासारखी अनेक लोकाभिमुख कामे मोदी सरकारने केल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)आंबा उत्पादकांचे कर्ज माफ करावेअवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेकडो आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपये नुकसान झाले आहे. आंबा उत्पादनासाठी सोसायटी व बँकांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये शासनाने माफ करावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.तलाठ्यांचा संप आज मिटणार ?आचऱ्याचे मंडल अधिकारी मुंबरकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी १६ मे पासून जिल्ह्यात तलाठ्यांनी रजा आंदोलन पुकारले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, तलाठ्यांचा संप मिटण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असून, आजच्या आज संप मिटेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.चार दिवसात निर्णय?वाळू प्रश्न हरित लवादाकडे प्रलंबित असल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी निर्णय होण्याची शक्यता खासदार विनायक राऊत यांनी वर्तविली आहे.