शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:25 IST

प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावापाटबंधारे अधिकाऱ्यांनी केला इन्कार; काम सुरूच राहणार : राजन डवरी

वैभववाडी : प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.अरुणा प्रकल्पबाधित काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाशी लढा सुरू आहे. दरम्यान, अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांची सभा घेण्याचे मान्य केले होते. दोन तारखांना निश्चित केलेल्या सभा रद्द झाल्यामुळे बुधवारी सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, श्रीराम बांद्रे, सूर्यकांत नागप, विलास कदम, वामन बांद्रे, संदीप बांद्रे, पंकज कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या उजवा आणि डाव्या कालव्यांचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच भुईबावडा येथील मुख्य कालव्याचे काम बंद पाडल्याचा दावाही माध्यमांकडे केला.मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात : तानाजी कांबळेआम्हांला न्याय मिळत नसल्यामुळे कोणतेही काम करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचे समजले. जर पोलीस काम सुरू करीत असतील तर आमच्या मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या मागण्यांसाठी आम्हांला पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिला आहे.अरुणा प्रकल्पाचे कोणतेही काम कुणी बंद करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम लवकरात पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे कुणी काम बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही काम बंद ठेवणार नाही. वेळेत काम पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कालव्याचे काम आम्ही सुरूच ठेवले आहे, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले. तर काही लोक काम बंद करण्यास सांगत होते. मात्र, कालव्यांचे काम दिवसभर सुरू होते. उद्याही सुरुच राहील असे, सहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग