शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

अरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:25 IST

प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावापाटबंधारे अधिकाऱ्यांनी केला इन्कार; काम सुरूच राहणार : राजन डवरी

वैभववाडी : प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.अरुणा प्रकल्पबाधित काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाशी लढा सुरू आहे. दरम्यान, अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांची सभा घेण्याचे मान्य केले होते. दोन तारखांना निश्चित केलेल्या सभा रद्द झाल्यामुळे बुधवारी सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, श्रीराम बांद्रे, सूर्यकांत नागप, विलास कदम, वामन बांद्रे, संदीप बांद्रे, पंकज कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या उजवा आणि डाव्या कालव्यांचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच भुईबावडा येथील मुख्य कालव्याचे काम बंद पाडल्याचा दावाही माध्यमांकडे केला.मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात : तानाजी कांबळेआम्हांला न्याय मिळत नसल्यामुळे कोणतेही काम करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचे समजले. जर पोलीस काम सुरू करीत असतील तर आमच्या मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या मागण्यांसाठी आम्हांला पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिला आहे.अरुणा प्रकल्पाचे कोणतेही काम कुणी बंद करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम लवकरात पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे कुणी काम बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही काम बंद ठेवणार नाही. वेळेत काम पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कालव्याचे काम आम्ही सुरूच ठेवले आहे, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले. तर काही लोक काम बंद करण्यास सांगत होते. मात्र, कालव्यांचे काम दिवसभर सुरू होते. उद्याही सुरुच राहील असे, सहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग