शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:25 IST

प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअरुणाच्या कालव्यांचे काम बंद पाडले?, प्रकल्पग्रस्तांकडून दावापाटबंधारे अधिकाऱ्यांनी केला इन्कार; काम सुरूच राहणार : राजन डवरी

वैभववाडी : प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाचे कोणतेच काम होऊ देणार नाही असा निर्धार केलेल्या काही अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी कालव्यांचे काम बंद पाडल्याचा दावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने कालव्यांचे काम बंद पाडल्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या दाव्याचा इन्कार केला असून कोणत्याही परिस्थितीत काम बंद करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.अरुणा प्रकल्पबाधित काही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांचा प्रशासनाशी लढा सुरू आहे. दरम्यान, अरुणा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांची सभा घेण्याचे मान्य केले होते. दोन तारखांना निश्चित केलेल्या सभा रद्द झाल्यामुळे बुधवारी सुरेश नागप, तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, श्रीराम बांद्रे, सूर्यकांत नागप, विलास कदम, वामन बांद्रे, संदीप बांद्रे, पंकज कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या उजवा आणि डाव्या कालव्यांचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच भुईबावडा येथील मुख्य कालव्याचे काम बंद पाडल्याचा दावाही माध्यमांकडे केला.मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात : तानाजी कांबळेआम्हांला न्याय मिळत नसल्यामुळे कोणतेही काम करू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केल्याचे समजले. जर पोलीस काम सुरू करीत असतील तर आमच्या मागण्याही पोलिसांनीच पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या मागण्यांसाठी आम्हांला पोलीस ठाण्यात जाऊन बसावे लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी दिला आहे.अरुणा प्रकल्पाचे कोणतेही काम कुणी बंद करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम लवकरात पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे कुणी काम बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही काम बंद ठेवणार नाही. वेळेत काम पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे कालव्याचे काम आम्ही सुरूच ठेवले आहे, असे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले. तर काही लोक काम बंद करण्यास सांगत होते. मात्र, कालव्यांचे काम दिवसभर सुरू होते. उद्याही सुरुच राहील असे, सहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग