शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था

By सुधीर राणे | Updated: August 23, 2022 14:00 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक डाऊन व्हॅन, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार

कणकवली : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई, उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांसाठी जादा १९१ गाड्या तर परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ९ गाड्याही सुरू असल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी खराडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी लवू गोसावी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे बसस्थानक येथे ब्रेक डाऊन व्हॅन कार्यरत असणार आहे. त्याशिवाय बांदा ते खारेपाटण या परिसरात फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.'अशा' सोडण्यात येणार जादा गाड्या२६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात जादा गाड्या येतील.  यंदा चाकरमान्यांना घेऊन १९१ जादा गाड्या  जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबईवरून २६ ऑगस्टला २ गाड्या, २७ ऑगस्टला ८६ गाड्या, २८ऑगस्टला ४३ गाड्या, २९ ऑगस्टला ५४ गाड्या, ३० ऑगस्टला ६ गाड्या सिंधुदुर्गसाठी सोडण्यात येणार आहेत. तर त्यापैकी सावंतवाडी आगारात ८९, मालवण येथे १३, कणकवली ५९, देवगड १२, विजयदुर्ग १०, कुडाळ १, वेंगुर्ला ७ गाड्या येतील. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यायाखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने  प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून  मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी १२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी ५४  गाड्यांचे बुकिंग झाले आहे. अजून ७३ गाड्या उपलब्ध आहेत. ४ ते ११ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. या व्यतिरिक्त ९ नियमित गाड्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या प्रवासासाठी आणखीन गाड्याही वाढविल्या जाणार आहेत.रेल्वेच्या वेळापत्रकानुसार लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणाररेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे.महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्थामुंबईवरून येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा सध्या सुरू असलेल्या पंपावरूनच होईल. तसेच महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडे -झुडपे तोडण्यासाठी संबधित विभागांना कळविण्यात आले आहे. असेही रसाळ यांनी सांगितले.

एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्या !गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी एसटीच्या या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव