शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था

By सुधीर राणे | Updated: August 23, 2022 14:00 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक डाऊन व्हॅन, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार

कणकवली : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई, उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांसाठी जादा १९१ गाड्या तर परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात जाणाऱ्या नियमित ९ गाड्याही सुरू असल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी खराडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी लवू गोसावी उपस्थित होते.यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे बसस्थानक येथे ब्रेक डाऊन व्हॅन कार्यरत असणार आहे. त्याशिवाय बांदा ते खारेपाटण या परिसरात फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत जादा वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.'अशा' सोडण्यात येणार जादा गाड्या२६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात जादा गाड्या येतील.  यंदा चाकरमान्यांना घेऊन १९१ जादा गाड्या  जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मुंबईवरून २६ ऑगस्टला २ गाड्या, २७ ऑगस्टला ८६ गाड्या, २८ऑगस्टला ४३ गाड्या, २९ ऑगस्टला ५४ गाड्या, ३० ऑगस्टला ६ गाड्या सिंधुदुर्गसाठी सोडण्यात येणार आहेत. तर त्यापैकी सावंतवाडी आगारात ८९, मालवण येथे १३, कणकवली ५९, देवगड १२, विजयदुर्ग १०, कुडाळ १, वेंगुर्ला ७ गाड्या येतील. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. परतीच्या प्रवासासाठी १२७ गाड्यायाखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने  प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बस सोडल्या जाणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून  मुंबई तसेच विविध भागात जाण्यासाठी १२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी ५४  गाड्यांचे बुकिंग झाले आहे. अजून ७३ गाड्या उपलब्ध आहेत. ४ ते ११ सप्टेंबर याकालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. या व्यतिरिक्त ९ नियमित गाड्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या प्रवासासाठी आणखीन गाड्याही वाढविल्या जाणार आहेत.रेल्वेच्या वेळापत्रकानुसार लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणाररेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठीचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्रुप बुकिंगही सुरू आहे.महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्थामुंबईवरून येणाऱ्या गाड्यांना डिझेल पुरवठा सध्या सुरू असलेल्या पंपावरूनच होईल. तसेच महामार्गावर आणखीन दोन पेट्रोल पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, झाडे -झुडपे तोडण्यासाठी संबधित विभागांना कळविण्यात आले आहे. असेही रसाळ यांनी सांगितले.

एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्या !गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी एसटीच्या या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव