शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अर्जुनी वसाहतीस इंचभरही जागा देणार नाही

By admin | Updated: April 28, 2015 00:47 IST

शेतकऱ्यांचा निर्धार : भूसंपादनाच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू, भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये संताप

दत्तात्रय पाटील -म्हाकवे --सीमाभागाचे चटके सहन करतच जगणाऱ्या अर्जुनी व गायकवाडी येथील ग्रामस्थांवर शेतकऱ्यांमागे आता औद्योगिक वसाहतींचाही ससेमिरा लागला आहे. अर्जुनी औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू असून, यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना नोटिसाही लागू केल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत असून, एक इंचही जागा औद्योगिक वसाहतींसाठी न देण्याचा निर्धार येथील शेतकऱ्यांनी केला आहे.वडिलोपार्जित उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या जमिनी जाऊन भूमिहीन होण्याच्या भीतीने येथील शेतकरी सैरभैर झाले आहेत. ही जमीन हस्तांतरित होऊ नये, यासाठी येथील शेतकरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची मनधरणी तसेच अर्ज, निवेदनाद्वारे गेल्या पाच वर्षांपासून विनंत्या करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या दृष्टीने कागदोपत्री प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. अर्जुनी (ता. कागल) येथे सुमारे ६२५ एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत वसविण्याच्या दृष्टीने २०१० पासून शासनस्तरावरून हालचाली गतिमान झाल्या आहेत. अर्जुनीच्या हद्दीमध्ये शेजारीच असणाऱ्या गायकवाडी (ता. चिक्कोडी) या सीमावासियांच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. ६२५ पैकी तब्बल ४६० एकर जमीन ही गायकवाडी येथील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आहेत.सध्या या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी चिकोत्रा, वेदगंगा नदीवरून पाणी योजना केल्या आहेत. तसेच ६६ विहिरी, २२ बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता झाली आहे. मात्र, शासनदरबारी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. ही जमीन पडीक व लालसर मातीची आहे. तसेच या जमिनीपासून नदीचे अंतर अडीच कि. मी. भरत असताना ते साडे सहा कि. मी. दाखविण्यात आले आहे.अर्जुनी हे कागल तालुक्यातील गाव आहे. महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसाठी वीज दरवाढ, अपुऱ्या सोयी-सवलती, आदी कारणांमुळे येथील उद्योजक कर्नाटकात स्थलांतरित होत आहेत. तसेच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्येही अद्याप शेकडो एकर जमीन वापराविना पडून असून, गडहिंग्लज, पेठवडगाव औद्योगिक वसाहतीचीही परिस्थिती तशीच आहे. मग, पुन्हा अर्जुनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन काय करणार आहात? असा सवालही येथील शेतकरी विचारत आहेत. त्याचबरोबर अर्जुनीचे एकूण १८६५ एकर क्षेत्र असून, यापैकी १५० एकर तलावासाठी, निपाणी वॉटर वर्कसाठी सुमारे ५० एकर, देवचंद कॉलेजसाठी ३४ एकर, व्यापारी संघासाठी २० एकर, गायरान साडे अकरा एकर, देवस्थान ११ एकर १३ गुंठे, डोंगरभाग ५४ एकर ५ गुंठे, तसेच पोटखराव, ओढे, नाले आणि रस्त्यासाठी ५० एकर जमीन गेली आहे. आता ६२५ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित झाली, तर येथील शेतकऱ्यांना झोळ्या घेऊन भीक मागण्याशिवाय पर्याय उरेल का? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटत आहेत. २०१०-११ पासून औद्योगिक वसाहतीच्या विरोधात अर्जुनीसह गायकवाडीतील शेतकरी लढा देत आहेत. रास्ता रोको, मोर्चे, आंदोलने या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. मात्र, अधिकारी याकडे डोळेझाकपणा करून हालचाली सुरूच ठेवत आहेत.दरम्यान, ही वसाहत अर्जुनीच्या हद्दीत होऊ घातली आहे. मात्र, या ग्रामपंचायतीला कोणतीही नोटीस अथवा माहिती दिलेली नसून, कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला कमी लेखून तिचा अवमानच केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे....तर ही वसाहत पाहिजे कोणाला !येथील शेतकऱ्यांसह कागलचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यासह निपाणीच्या आमदार शशिकला ज्वोल्ले, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, आदी सर्वांनीच या वसाहतीला लेखी स्वरूपात विरोध दाखवून येथील शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या वसाहतीला थेट विरोध केला. मग ही वसाहत कोणाच्या सांगण्यावरून होत असून, नेमकी कोणाला पाहिजे आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. शासनाची दिशाभूलनिपाणी शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव या संभाव्य औद्योगिक वसाहतीलगत आहे. तसेच लिंगनूर, खडकेवाडा, कोडणी, अर्जुनी, गायकवाडी येथील ग्रामस्थांनाही प्रदूषणाचा मोठा धोका आहे. मात्र, जाणिवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून काही अधिकारी शासनाची दिशाभूल करून ही वसाहत करण्याचा खटाटोप करीत आहेत. तसेच मूठभर लोकांच्या हितासाठी हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणार आहात काय ? असा सवालही केला जात आहे.