शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उत्खननाला बसणार चाप

By admin | Updated: November 12, 2014 22:53 IST

ॉप्रशासनाची आक्रमक भूमिका : रॅम्प तोडले, होड्याही केल्या निकामी, व्यावसायिकांचे धाबे दणाणले

रजनीकांत कदम - कुडाळ -जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूची वाढती तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यातील वाळू तस्करी थांबविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उत्खनन थांबविण्याकरिता कारवाईचा बडगा उचलला असून त्यांनी नदीपात्रालगचे रॅम्प तोडले व होड्याही निकामी केल्या आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक धोरणामुळे वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. जिल्ह्यात गौण खनिज बंदीमुळे शासनाने नदीपात्रातील वाळू उत्खनन, वाळू वाहतूक व वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात बंदी घातली होती. या बंदीमुळे गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन, वाळू वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, या जिल्ह्यात तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यात येथील वाळूला मोठी मागणी असल्याने व वाढत्या मागणीबरोबरच येथील वाळू उत्खनन वा वाळू वाहतूक, विक्री ही चोरीच्या पद्धतीने होऊ लागली. गौण खनिज बंदीमुळे वाळूवरही बंदी आल्यामुळे वाढत्या मागणीचा पुरवठा होऊ शकला नाही. अशातच चोरीच्या पद्धतीने वाळू देण्याच्या प्रक्रियेमुळे जी वाळू त्यावेळी चार ते पाच हजारात मिळत होती, तीच वाळू तीस ते पस्तीस हजारापर्यंत मिळू लागली आणि वाळूला सोन्याचा भाव मिळू लागला. त्यामुळे हल्ली वाळूला मोठे महत्त्व आले होते. या व्यवसायात नदीकिनाऱ्यालगतचे स्थानिक लोकच असत. मात्र, बंदीमुळे या वाळूला सोन्यासारखे भाव असल्यामुळे या व्यवसायाशी कधीही निगडीत नसलेले इतर व्यवसायातील अनेक व्यावसायिक या वाळू व्यवसायात उतरले. कारण मोठ्या प्रमाणात पैसा या व्यवसायातून उपलब्ध होत आहे. वाळूवर बंदी आल्याने चोरीच्या पद्धतीने वाळू विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने या व्यवसायात अनेक धनदांडगे उतरले. मात्र, यामुळे जेमतेम दर ठेवून वाळू व्यवसाय करणारे स्थानिक वाळू व्यावसायिक मात्र आपोआप बाजूला सारले गेले. वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणातवाळू उत्खनन बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने या व्यवसायात उतरलेल्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन जिल्ह्यातील नदी तसेच खडीपात्रात सुरू केले. अनेकजणांनी या ठिकाणी वाळू व्यवसाय करण्याच्या ठिकाणी नवीन होड्या आणल्या. तर काहींनी गोवा येथील मायनिंगचे तसेच इतर ठिकाणाहून वाळू वाहतूक करण्यासाठी डंपर आणले. वाळू कामगार म्हणून परप्रांतीयही आले. रात्रभर वाळू उत्खनन, वाहतूक सुरूशासनाच्या नियमांना पायदळी तुडवीत वाळू व्यावसायिकांनी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वाहतूक सुरू केली. या वाहतुकीमुळे काही ठिकाणचे रस्तेही खड्डेमय झाले आहेत. येथील वाळूला जिल्ह्यापेक्षा इतर राज्यात मोठा भाव मिळत असल्याने येथील वाळू काढून ही वाळू गोवा, कोल्हापूर या ठिकाणी विकली जात आहे. नियमबाह्य अनधिकृतपणे झोपड्या बांधून असलेल्या परप्रांतीय कामगारांनाही जिल्ह्याबाहेर काढण्यात आले. अशाप्रकारे संपूर्ण रात्र ते पहाटेपर्यंत केव्हाही, कुठेही कारवाईचा बडगा शासनाकडून उगारला जात होता. या कारवाईतून काही वर्षे प्रशासनाला लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. जेवढ्या प्रमाणात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला, त्याप्रमाणात अधिकच वाळू उत्खनन झाले. शिवाय वाळूचा दरही कमी न होता वाढतच राहिला. परंतु आता वाळू किनाऱ्यावर आणणाऱ्या होड्यांवरच जप्तीच्या आदेशानुसार प्रशासन कारवाई करीत असल्याने वाळू व्यावसायिक धास्तावले आहेत. प्रशासन-वाळू व्यावसायिकांत वादकारवाईचा बडगा उगारून मोठ्या प्रमाणात दंड आकारणी तसेच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केल्यामुळे काही ठिकाणी वाळू व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांबरोबर वाद सुरू केले. गेल्या वर्षीच्या अखेरीस जिल्ह्यातील काही गावातील वाळू उत्खनन करण्यासंदर्भात असलेली बंदी उठवून परवानाधारकांना वाळू उत्खनन करण्यास शासनाने परवानगी दिली. काही गावात शासनाच्या परवानाधारकांनी वाळू उत्खनन सुरू केले. मात्र, यावेळी अनधिकृत वाळू व्यावसायिकांना याचा फटका बसल्याने अनधिकृत वाळू व्यावसायिक यांच्यात नव्याने वादाला सुरुवात झाली.परवानाधारक वाळूवर पुन्हा बंदी!गेल्या वर्षी काही गावातील असलेली वाळू बंदी उठवून परवानाधारकांना त्या ठिकाणी वाळू उत्खननास परवानगी दिली होती. वाळू उत्खनन परवानगी ही ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने आॅक्टोबर महिन्यापासून ही बंदी पुन्हा सुरू केली. बंदी उठलेल्या ठिकाणीही वाळूवर पुन्हा बंदी आल्याने आॅक्टोबर महिन्यापासून सर्व ठिकाणांहून जोरदार चोरटे वाळू उत्खनन व वाहतूक सुरू झाली. अनेकदा हजारो रुपयांचा दंड करून गुन्हा दाखल करूनही वाळू वाहतूक अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे या अनधिकृत वाळूबाबतच्या अनेक तक्रारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी वाळू वाहतुकीपेक्षा वाळू उत्खननास सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या होड्यांवरच येत्या ४८ तासात नदीपात्रातसून न हटविल्यास होड्या जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.