शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

By सुधीर राणे | Updated: June 21, 2023 14:17 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी फेडरेशनने काहीच केलेले नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंवर अन्याय झाला असल्याचा आरोप शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा क्रीडा भारती मुंबईचे अध्यक्ष रवींद्र करमळकर, कबड्डीप्रेमी बाळासाहेब सावंत, अण्णा कोदे, संघटक राजन रेडकर, नंदन वेंगुर्लेकर यांनी केला आहे.तसेच जिल्ह्याच्या निवड चाचणीत प्रामाणिक खेळाडूंना बाद करत वशिलेबाजीने इतरांची नियुक्ती केली जाते.  जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या या चुकीच्या आणि मनमानी कारभारा विरोधात आम्ही महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.सिंधुदुर्गातील कबड्डी खेळाचे संवर्धन व्हावे, कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कणकवली येथे कबड्डी खेळाडू आणि कबड्डीप्रेमींची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघर्ष व उत्कर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी  संवाद साधला. यावेळी एनआयएस कबड्डी कोच दिनानाथ बांदेकर, रतनकुमार झाजम आदींसह कबड्डी खेळाडू उपस्थित होते. रवींद्र करमळकर म्हणाले, कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी आपण आजवर काम केले. मात्र जिल्हा फेडरेशनकडून कबड्डी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी कोणतेही चांगले काम झालेले नाही. जिल्ह्यात कबड्डीमध्ये अपप्रवृती बळावत आहे. आम्ही सिंधुदुर्गातील अन्यायग्रस्त कबड्डी पटूंच्या पाठीशी राहणार आहोत. येत्या काळात जिल्ह्यातील आठही तालुक्यात कबड्डी खेळाचे संवर्धन करण्याबरोबरच कबड्डीचा कृती आराखडा बनवणे, तंत्रशुद्ध प्रशिक्षण स्पर्धा भरवणे, सिंधुदुर्गातील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करणार असल्याचे  करमळकर यांनी सांगितले. नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या कारभाराबाबत अनेक खेळाडुंच्या तक्रारी आहेत. किशोर गट, कुमार गट, खुला गट या तीन गटांसाटी निवड चाचणी जिल्ह्याच्या विशिष्ट ठिकाणी लावली जाते. चुकीची कारणे दाखवत चांगल्या खेळांडुना डावलले जाते. निवड चाचणी सदस्यही त्यांचेच असतात. चाचणीत निवड झालेल्या खेळाडुंना हेतूपुरस्सर डावलेले जाते. फेडरेशन स्वतः आयोजक म्हणून कोणत्याही स्पर्धा घेत नाही. स्पर्धेच्या आयोजक मंडळांची दिशाभूल केली जाते. फेडरेशनकडे येणारे पैसे खेळाडुंवर खर्च होत नाहीत असा आरोपही वेंगुर्लेकर यांनी केला. अण्णा कोदे म्हणाले, कणकवलीतील प्रणय राणे या खेळाडूची निवड प्रो कबड्डीसाठी झाली. मात्र, फेडरेशनने त्याचा साधा सत्कारही केला नाही. ही शोकांतिका आहे. मग खेळाडुंना प्रोत्साहन मिळणार कसे? राजन रेडकर, बाळासाहेब सावंत यांच्यासह सर्वांनीच जिल्हा कबड्डी फेडरेशन विरोधात नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKabaddiकबड्डी