शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:25 IST

road safety Pwd Sindhudurg- सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार महादेवाचे केरवडेत ग्रामस्थांची बैठक

माणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग व कोल्हापूरला सर्वात कमी अंतराने जोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट कुडाळ तालुक्यातील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यांच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव दरम्यान आहे. केवळ साडेचार किलोमीटर अंतराच्या या घाटाला चालना देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन महादेवाचे केरवडेतील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर केले होते.यावेळी हा घाटमार्ग दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आता निर्णायक व आरपार लढा देण्याचे ठरले. यावेळी व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, दादा बेळणेकर, श्याम पावसकर, सुभाष भिसे, तुषार परब, एकनाथ केसरकर, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, श्रीकृष्ण नेवगी, नारायण लोहार, शंकर कोराने, कृष्णा पंदेरे, राजन गुरव, रामचंद्र कदम, विश्रांत केसरकर आदी उपस्थित होते. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला माणगाव खोऱ्यापुरता मर्यादित असलेल्या या लढ्यात आता राजू मसुरकर व सुनील दुबळे यांच्या माध्यमातून सावंतवाडी व वेंगुर्ला हे तालुकेही उतरले आहेत.सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली, फोंडा, करूळ, भुईबावडा घाट मार्गांपेक्षा या घाटामुळे ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतरही ५५ किलोमीटरने कमी होणार आहे.हा घाटमार्ग शिवकालीन पाणंद म्हणून परिचित आहे तसेच वसोली ग्रामपंचायतीत हा मार्ग २६ नंबरला यापूर्वीच नोंद केला आहे. याच मार्गाने ब्रिटीश काळात वेंगुर्ला बंदरात व्यापार चालत असे. या घाटाचे अंतर केवळ साडेचार किलोमीटरचे असून, घाटात केवळ एकमेव वळण लागते आणि एक किलोमीटर अंतराचा रस्ता आंजिवडेवासीयांनी श्रमदानातून तयार केला आहे.गत सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या घाटाच्या सर्वेक्षणात अंदाजे खर्च ३२ कोटी रुपये इतकाच दाखविला आहे. त्यामध्ये एक मोठे वळण व चार-पाच लहान मोऱ्या निर्धारित केल्या आहेत. ही पाणंद शिवकालीन असल्याने वन खात्याने वीस फूट रुंदीचा मार्ग माथ्यापर्यंत झाडेझुडपे तोडून साफ केला आहे.घाट अस्तित्वात आल्यास होणारे फायदेया घाटामुळे सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर ११५ किलोमीटर तर वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतर १२५ किलोमीटर होणार आहे. माणगाव येथील प्रख्यात दत्त मंदिर, टेंबे स्वामी जन्मस्थळ, महादेवाचे केरवडेतील सिध्द महादेव मंदिर, मोरे येथील स्वप्ननगरी, ऐतिहासिक रांगणा व मनोहरमन संतोषगड, पाटगाव येथील मौनी महाराजांचा मठ, तांबालेचा महिला साखर कारखाना, गारगोटी येथील मौनी विद्यापीठ, भुदरगड, आदमापूरचे बाळू मामा, वेंगुर्ला बंदर, शिरोडा बंदर, चिपी विमानतळ, झाराप रेल्वे जंक्शन आदी असंख्य ठिकाणे व पर्यटनस्थळे यामुळे जोडली जाणार आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग