शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:25 IST

road safety Pwd Sindhudurg- सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआंजिवडे घाट पूर्ण करण्याचा निर्धार, त्रिसूत्रीचा अवलंब करणार महादेवाचे केरवडेत ग्रामस्थांची बैठक

माणगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ ३२ कोटी रुपये खर्च निर्धारित केलेला कुडाळ तालुक्यातील आंजिवडेजवळील भैरीची पाणंद घाट हा राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करीत लवकरात लवकर पूर्ण करायचाच, असा निर्धार घाट कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग व कोल्हापूरला सर्वात कमी अंतराने जोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट कुडाळ तालुक्यातील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यांच्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव दरम्यान आहे. केवळ साडेचार किलोमीटर अंतराच्या या घाटाला चालना देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन महादेवाचे केरवडेतील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर केले होते.यावेळी हा घाटमार्ग दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आता निर्णायक व आरपार लढा देण्याचे ठरले. यावेळी व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, दादा बेळणेकर, श्याम पावसकर, सुभाष भिसे, तुषार परब, एकनाथ केसरकर, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, श्रीकृष्ण नेवगी, नारायण लोहार, शंकर कोराने, कृष्णा पंदेरे, राजन गुरव, रामचंद्र कदम, विश्रांत केसरकर आदी उपस्थित होते. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला माणगाव खोऱ्यापुरता मर्यादित असलेल्या या लढ्यात आता राजू मसुरकर व सुनील दुबळे यांच्या माध्यमातून सावंतवाडी व वेंगुर्ला हे तालुकेही उतरले आहेत.सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली, फोंडा, करूळ, भुईबावडा घाट मार्गांपेक्षा या घाटामुळे ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतरही ५५ किलोमीटरने कमी होणार आहे.हा घाटमार्ग शिवकालीन पाणंद म्हणून परिचित आहे तसेच वसोली ग्रामपंचायतीत हा मार्ग २६ नंबरला यापूर्वीच नोंद केला आहे. याच मार्गाने ब्रिटीश काळात वेंगुर्ला बंदरात व्यापार चालत असे. या घाटाचे अंतर केवळ साडेचार किलोमीटरचे असून, घाटात केवळ एकमेव वळण लागते आणि एक किलोमीटर अंतराचा रस्ता आंजिवडेवासीयांनी श्रमदानातून तयार केला आहे.गत सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या घाटाच्या सर्वेक्षणात अंदाजे खर्च ३२ कोटी रुपये इतकाच दाखविला आहे. त्यामध्ये एक मोठे वळण व चार-पाच लहान मोऱ्या निर्धारित केल्या आहेत. ही पाणंद शिवकालीन असल्याने वन खात्याने वीस फूट रुंदीचा मार्ग माथ्यापर्यंत झाडेझुडपे तोडून साफ केला आहे.घाट अस्तित्वात आल्यास होणारे फायदेया घाटामुळे सावंतवाडी ते कोल्हापूर हे अंतर ११५ किलोमीटर तर वेंगुर्ला ते कोल्हापूर हे अंतर १२५ किलोमीटर होणार आहे. माणगाव येथील प्रख्यात दत्त मंदिर, टेंबे स्वामी जन्मस्थळ, महादेवाचे केरवडेतील सिध्द महादेव मंदिर, मोरे येथील स्वप्ननगरी, ऐतिहासिक रांगणा व मनोहरमन संतोषगड, पाटगाव येथील मौनी महाराजांचा मठ, तांबालेचा महिला साखर कारखाना, गारगोटी येथील मौनी विद्यापीठ, भुदरगड, आदमापूरचे बाळू मामा, वेंगुर्ला बंदर, शिरोडा बंदर, चिपी विमानतळ, झाराप रेल्वे जंक्शन आदी असंख्य ठिकाणे व पर्यटनस्थळे यामुळे जोडली जाणार आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग